शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

अन्न भेसळ रोखण्यासाठी हवी सकारात्मक मानसिकता!

By admin | Updated: October 16, 2016 02:27 IST

भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे जनजीवन सापडतेय धोक्यात

वाशिम, दि. १५- कमी खर्चात अधिक नफा मिळविण्याच्या हव्यासापायी विक्रेत्यांकडून विविध खाद्यपदार्थांंमध्ये भेसळ केली जाते. या गंभीर प्रकारामुळे मात्र जनजीवन धोक्यात सापडत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सकारात्मक मानसिकतेची नितांत गरज भासत आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ सेवनात आल्याने असाध्य आजारांना आयते निमंत्रण दिले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी याबाबत तारतम्य बाळगायला हवे. सोबतच प्रत्येक कुटुंबाने तद्वतच घरातील गृहिणीने अन्नपदार्थांंंमधील भेसळ ओळखण्याचे तंत्र आत्मसात करण्याची वेळ आज खर्‍या अर्थाने ओढवली आहे. अन्न भेसळ समस्येचा विचार करताना अन्न व भेसळ या दोन शब्दांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अन्न हा शब्द उच्चारल्यानंतर जेवणातील विविध खाद्यपदार्थ डोळ्यापुढे उभे राहतात. शरीराचे पोषण करण्यासाठी उपयोगात येणार्‍या विविध पदार्थांंंचा त्यात समावेश होतो; तर भेसळ म्हणजे शुद्ध अवस्थेतील किंवा मूळ अवस्थेतील अन्नपदार्थात इतर घटक मिसळणे अथवा मूळ पदार्थातील महत्त्वपूर्ण घटक कमी करणे म्हणजे अन्नपदार्थातील भेसळ म्हणता येईल. साधारणत: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कणिक, मैदा आदींमध्ये खडे, वाळू, माती, जास्तीचा कोंडा, खडूची भुकटी, निकृष्ट प्रतिचे धान्य वापरून भेसळ केली जाते. हरभर्‍याची डाळ, तुरीची डाळ, बेसन यामध्ये लाखीची डाळ, पिवळा रंग, मक्याचे पीठ, लाखीच्या डाळीचे पीठ हे पदार्थ वापरून भेसळ केली जाते. तसेच रव्यामध्ये लोहकण वापरून भेसळ करतात. हळद, तिखट, मोहरी, जिरे, धन्याची भुकटी यामध्ये पिवळी माती, स्टार्च, भुसा, गेरू, पिवळय़ा धोत्र्याच्या बिया, जिर्‍यासारख्या दिसणार्‍या दुसर्‍या बिया वापरून अनेक जण भेसळ करतात. दालचिनीमध्ये झाडाच्या साली वापरून भेसळ केली जाते; तर आमचूर व ओव्यामध्ये बारीक वाळू, माती मिसळवून भेसळ करतात. हिंगामध्ये डिंक माती टाकून भेसळ होते. कॉफीमध्ये चिंचोक्याची भुकटी मिसळून अनेक जण भेसळ करतात.