शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलाव, धरणांतील ‘गाळा’ला मिळणार रॉयल्टीतून सूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:25 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियान अन्य गौण खनिजांना रॉयल्टी लागू शेतक-यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे सवलत धरणांतून किंवा तलावांतून उत्खनन करण्यात येणा-या अन्य गौण खनिजांना रॉयल्टी पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे.धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट होत असल्याने सदर गाळ उपसा करुन शेतात गावळ पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने धरणांमधील गाळ काढुन तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना राज्य शासनातर्फे राबविली जात आहे. या योजनेंतर्गत गाळ काढून सदर गाळ शेतात पसरविण्याकरिता स्वामित्वधन (रॉयल्टी) व अर्ज फी मधून सुट देण्याची मागणी विविध स्तरावरून झाली होती तसेच शासनदेखील यासंदर्भात सकारात्मक होते. याप्रमाणेच पाझर तलाव व गाव तलावाची साठवणुक क्षमता वाढविण्याकरिता त्याच्या बुडीत क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फी मधून वगळण्याची मागणीही समोर आली होती. त्या अनुषंगाने आता शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत धरणांमधील काढलेल्या गाळ किंवा मातीला रॉयल्टीतून वगळले आहे. याचा लाभ शेतक-यांना होणार आहे. दुसरीकडे ही सवलत संबंधित धरणातून किंवा तलावातून उत्खनन करण्यात येणाºया  अन्य गौण  खनिजांचा लागू राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात वाशिमचे तहसीलदार बलवंत अरखराव यांना विचारले असता, ते म्हणाले की ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत वरिष्ठांकडून प्राप्त सुचनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी