शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तलाव, धरणांतील ‘गाळा’ला मिळणार रॉयल्टीतून सूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:25 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियान अन्य गौण खनिजांना रॉयल्टी लागू शेतक-यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे सवलत धरणांतून किंवा तलावांतून उत्खनन करण्यात येणा-या अन्य गौण खनिजांना रॉयल्टी पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे.धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट होत असल्याने सदर गाळ उपसा करुन शेतात गावळ पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने धरणांमधील गाळ काढुन तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना राज्य शासनातर्फे राबविली जात आहे. या योजनेंतर्गत गाळ काढून सदर गाळ शेतात पसरविण्याकरिता स्वामित्वधन (रॉयल्टी) व अर्ज फी मधून सुट देण्याची मागणी विविध स्तरावरून झाली होती तसेच शासनदेखील यासंदर्भात सकारात्मक होते. याप्रमाणेच पाझर तलाव व गाव तलावाची साठवणुक क्षमता वाढविण्याकरिता त्याच्या बुडीत क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फी मधून वगळण्याची मागणीही समोर आली होती. त्या अनुषंगाने आता शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत धरणांमधील काढलेल्या गाळ किंवा मातीला रॉयल्टीतून वगळले आहे. याचा लाभ शेतक-यांना होणार आहे. दुसरीकडे ही सवलत संबंधित धरणातून किंवा तलावातून उत्खनन करण्यात येणाºया  अन्य गौण  खनिजांचा लागू राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात वाशिमचे तहसीलदार बलवंत अरखराव यांना विचारले असता, ते म्हणाले की ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत वरिष्ठांकडून प्राप्त सुचनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी