शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पाच कोटींच्या योजनेचे पाणी दुषित: व्हॉल्वमध्ये गटाराचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:10 IST

शिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे २०१२ पर्यंत अपुºया व्यवस्थेमुळे ग्रामस्थांना सतत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असे. गावात पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची जलवाहिनी अडोळ प्रकल्प ते शिरपूरपर्यंत एकेरीच होती. त्यामुळे समस्येत अधिकच भर पडली होती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरवठा करून राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून अडोळ प्रकल्प ते शिरपूर जैन अशी जवळपास दहा किलोमीटर अंतराची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. गावातही बºयाच ठिकाणी नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. गावकºयांसाठी उपयुक्त असलेल्या या योजनेचे काम सुरू असतानाच बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. कामाच्या तक्रारी झाल्या, उपोषणे झाली आणि त्याची चौकशीही झाली. हे काम बरेच दिवस चालले. या काळात तीन वेळा राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्षही बदलण्यात आले. या योजनेवर जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे या योजनेतून गावकºयांची तहान भागविण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे अपेक्षीत होते; परंतु ही अपेक्षा फलद्रूपच झाली नाही. सद्यस्थितीत अडोळ प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा असल्याने तीन दिवसाला गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी हे पाणी पिण्यायोग्य नाही. या योजनेंतर्गत गावकºयांना पाणी पुरवठा करण्यासाठी जी जलवाहिनी बसविण्यात आली. त्या जलवाहिनीवरील बरेच व्हॉल्व लिक झाले आहेत. काही व्हॉल्वच्या लगतच गटार साचले असून, या गटाराचे पाणी व्हॉल्वमध्ये घुसते. त्यामुळे नळाद्वारे गावकºयांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून, केवळ कपडे धुण्यासह इतर कामासाठीच त्याचा वापर करता येत आहे. त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाही दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती असल्याने बहुतांश लोक कॅनचे पाणी घेऊन आपली तहान भागवित आहेत. पाच कोटींच्या योजनेतून नळाद्वारे मिळणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, सांगण्याची तसदी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत नसल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन