शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पाच कोटींच्या योजनेचे पाणी दुषित: व्हॉल्वमध्ये गटाराचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:10 IST

शिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे २०१२ पर्यंत अपुºया व्यवस्थेमुळे ग्रामस्थांना सतत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असे. गावात पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची जलवाहिनी अडोळ प्रकल्प ते शिरपूरपर्यंत एकेरीच होती. त्यामुळे समस्येत अधिकच भर पडली होती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरवठा करून राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून अडोळ प्रकल्प ते शिरपूर जैन अशी जवळपास दहा किलोमीटर अंतराची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. गावातही बºयाच ठिकाणी नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. गावकºयांसाठी उपयुक्त असलेल्या या योजनेचे काम सुरू असतानाच बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. कामाच्या तक्रारी झाल्या, उपोषणे झाली आणि त्याची चौकशीही झाली. हे काम बरेच दिवस चालले. या काळात तीन वेळा राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्षही बदलण्यात आले. या योजनेवर जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे या योजनेतून गावकºयांची तहान भागविण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे अपेक्षीत होते; परंतु ही अपेक्षा फलद्रूपच झाली नाही. सद्यस्थितीत अडोळ प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा असल्याने तीन दिवसाला गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी हे पाणी पिण्यायोग्य नाही. या योजनेंतर्गत गावकºयांना पाणी पुरवठा करण्यासाठी जी जलवाहिनी बसविण्यात आली. त्या जलवाहिनीवरील बरेच व्हॉल्व लिक झाले आहेत. काही व्हॉल्वच्या लगतच गटार साचले असून, या गटाराचे पाणी व्हॉल्वमध्ये घुसते. त्यामुळे नळाद्वारे गावकºयांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून, केवळ कपडे धुण्यासह इतर कामासाठीच त्याचा वापर करता येत आहे. त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाही दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती असल्याने बहुतांश लोक कॅनचे पाणी घेऊन आपली तहान भागवित आहेत. पाच कोटींच्या योजनेतून नळाद्वारे मिळणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, सांगण्याची तसदी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत नसल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन