शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिसोड नगर परिषदेत निवडणुकीने तापविले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 15:49 IST

रिसोड (वाशिम) - रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरूवात होणार असून, प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरूवात होणार असून, प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. १२ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्याला सुरूवात होणार आहे. १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान मतदान आणि १० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून रिसोडकडे पाहिले जाते. गत पंचवार्षिक निवडणुकीत रिसोड नगर परिषदेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख व तत्कालिन राकाँचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांच्या आघाडीची सत्ता होती. मध्यंतरीच्या काळात भगवानराव क्षीरसागर यांनी राकाँला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे भारिप-बमसंही यावेळी निवडणुक आखाड्यात उतरत असल्याने चौरंगी, पंचरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रमुख पक्षांनी सध्यातरी स्वबळावर किंवा पक्षाच्या चिन्ह्यावर निवडणूक लढविण्याचे जाहिर केलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी होणार की प्रत्येकजण स्वबळावर लढणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी प्रत्येक पक्षाने शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्याची मोहिम युद्धस्तरावर हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांमध्ये अतितटीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिसोड नगर परिषद निवडणुकीवर प्रमुख पक्षांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक