शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

मंगरूळपीरातील पोलिस चौक्या बुधवारपासून सुरू

By admin | Updated: May 28, 2014 00:32 IST

पोलीस चौक्या नव्याने सुरू करण्याबाबत पोलीस दलात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मंगरूळपीर : कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौक्या नव्याने सुरू करण्याबाबत पोलीस दलात हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकमतने बंद असणार्‍या चौक्यांचा पोस्टमार्टेम केल्यानंतर या चौक्या २८ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी दिली. गत १५ वर्षांपूर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने दोन पोलीस चौक्या सुरू केल्या होत्या. परिणामी, शहरातील गुन्हेगारीचा आलेख नियंत्रणात येऊन चोर्‍यांचे प्रमाणही कमी झाले होते. परंतु काळाच्या ओघात व मनुष्यबळ कमी झाल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनने या पोलीस चौक्यांकडे दुर्लक्ष केले होते. शहराच्या बिटमध्ये कर्तव्यावर असणारे बिट जमादार अथवा पोलीस कर्मचारी कधीच या चौक्यांकडे फिरकत नसल्यामुळे चौक्या नेहमीच बंद राहत आहेत. याचा परिणाम, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला असुन शहरवासीयांची डोकेदुखीही वाढली आहे. लोकमतने हाच धागा पकडुन २७ मे च्या अंकात बंद चौक्याचे पोस्टमार्टेम केले. परिणामी, पोलीस दल खळबळून जागे झाले आहे. २८ मे पासून चौक्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.