शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

वाशिम : पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर ...

वाशिम : पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे सुरू आहेत. या ग्रामपंचायतीत आता बिहार पॅटर्नच्या धर्तीवर लाखो वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगरूळपीर आणि कारंजाच्या गटविकास अधिकाऱ्यांना ३० ऑगस्ट रोजी दिले आहेत.

जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरूळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. यात जलसंधारण, मृदसंधारणासह, वृक्षलागवड या प्रमुख कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे लोकसहभागातून केली जात असली तरी काही कामे प्रशासनाच्या सहकार्यातूनही केली जात आहेत. आता पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४३ ग्रामपंचायतींत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन गावकऱ्यांकडून केले जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षरोपे उपलब्ध केली जाणार आहेत.

---------------

या गावांत होणार वृक्षलागवड

कारंजा तालुका (२४) : जानोरी, विळेगाव, अंतरखेडा, जामठी, बेलमंडळ, पोहा, उंबर्डा बाजार, काकड शिवणी, शिवनगर, दोनद, गायवळ, नारेगाव, बेलमंडळ, शेलूवाडा, धोत्रा देशमुख, धोत्रा जहाँगीर, शिवण, पिंपळगाव, बांबर्डा, बेलखेडा, शहादतपूर, आखतवाडा, पिंप्री मोडक, रामनगर.

०००००००००००००

मंगरूळपीर तालुका (१९) : लखमापूर, बोरव्हा, शेंदुरजना मोरे, सायखेडा, घोटा, स्वासीन, जांब, पिंप्री खु., चिंचाळा, लाठी, पिंपळखुटा, शेलगाव, तपोवन, नागी, पिंप्री (अवगन), उमरी बु., जनुना, जाेगलदरी, पारवा.

---------------

रोहयोतून मजुरांच्या हाताला काम

पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड करून पर्यावरणसंवर्धन करणे हाच उद्देश नाही, तर या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामही दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातून किमान पाच मजुरांच्या आधारे ४३ ग्रामपंचायतींत ही वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीनंतर याच कामगारांना या वृक्षांच्या संगोपन आणि संवर्धनाचे कामही दिले जाणार आहे.

००००००००००००००००

काय आहे बिहार पॅटर्न

धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्षलागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे लावलेली झाडे जगवता येऊ शकतात. त्याचे संरक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. त्या व्यक्तीच्या नावावरून त्या संकल्पनेला अर्थात वृक्षलागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न’ असे नामकरण केले गेले. ‘बिहार पॅटर्न’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.

०००००००००००००००००००००००

कोट :

समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावांचा सर्वांगीण विकास हेच पानी फाउंडेशन स्पर्धेमागील उद्दिष्ट आहे. वृक्षलागवडीतून पर्यावरणसंवर्धन आणि त्यातून दीर्घकाळ मजुरांच्या हाताला काम, याच उद्देशाने सहभागी ४३ गावांत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवड केली जाणार आहे.

-सुभाष नानवटे,

जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन