शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशिरापर्यंत केले जातेय छायाचित्र अपलोड करण्याचे काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:01 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देबांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत छायाचित्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. मानोरा, रिसोड व वाशिम तालुक्यातही छायाचित्र अपलोड करण्याचे व आर्थिक माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे.

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच आर्थिक माहितीदेखील भरावी लागत आहे. ही मोहिम पुर्णत्वाकडे नेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी आढावा घेत ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला. जिल्हा स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे व चमूने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देत शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत छायाचित्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. कारंजा तालुक्यात छायाचित्र अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मानोरा, रिसोड व वाशिम तालुक्यातही छायाचित्र अपलोड करण्याचे व आर्थिक माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी पिछाडीवर असलेल्या मंगरूळपीर तालुक्याने आता वेग पकडला असून, आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याची कसरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मालेगाव तालुका पिछाडीवर असून, जिल्हा परिषद प्रशासनाने मालेगाव तालुक्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान