शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

रात्री उशिरापर्यंत केले जातेय छायाचित्र अपलोड करण्याचे काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:01 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देबांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत छायाचित्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. मानोरा, रिसोड व वाशिम तालुक्यातही छायाचित्र अपलोड करण्याचे व आर्थिक माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे.

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच आर्थिक माहितीदेखील भरावी लागत आहे. ही मोहिम पुर्णत्वाकडे नेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी आढावा घेत ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला. जिल्हा स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे व चमूने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देत शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत छायाचित्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. कारंजा तालुक्यात छायाचित्र अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मानोरा, रिसोड व वाशिम तालुक्यातही छायाचित्र अपलोड करण्याचे व आर्थिक माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी पिछाडीवर असलेल्या मंगरूळपीर तालुक्याने आता वेग पकडला असून, आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याची कसरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मालेगाव तालुका पिछाडीवर असून, जिल्हा परिषद प्रशासनाने मालेगाव तालुक्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान