शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

क्षयरुग्णांसाठी ‘दुर्योधन’ आले धावून; झाले निक्षय मित्र; वर्षभर पुरविणार कोरडा आहार

By सुनील काकडे | Updated: September 30, 2023 14:33 IST

जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे;

वाशिम : क्षयरोगमुक्त भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता शासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांना ‘निक्षय मित्र’ बनून कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या महत्वाकांक्षी मोहीमेत आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी देखील सहभाग घेतला असून स्वत: निक्षय मित्र बनून मानोरा तालुक्यातील ४ क्षयरुग्णांना त्यांनी २८ सप्टेंबर रोजी दत्तक घेतले.

९ सप्टेंबर २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’ या महत्वाकांक्षी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. गोरगरिब कुटूंबातील ज्या व्यक्तींना क्षयरोगाने ग्रासले आहे, ते केवळ पैशांअभावी आवश्यक असलेला कोरडा आहार घेवू शकत नाहीत. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढे येवून गरजू क्षयरुग्णांना दत्तक घेत कोरडा आहार पुरवावा, याबाबत प्रभावी जनजागृती केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे; तर उर्वरित ५२८ क्षयरुग्णांना निक्षय मित्राची प्रतिक्षा लागून आहे. यादरम्यान २८ सप्टेंबर रोजी आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. सोबतच पुढील वर्षभरासाठी निक्षय मित्र बनून संबंधितांना पोषण आहाराची कीट देखील वितरित केली. जिल्ह्यातील दानशूरांनी या मोहीमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होवून क्षयरुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

चोंढी (ता.मानोरा) हे माझे मूळ गाव आहे. त्याठिकाणी सध्या सक्रीय असलेले आणि यापुढे आढळणारे सर्व क्षयरुग्ण मी स्वत: दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. निक्षय मित्र बनून कार्य करित असताना संबंधितांना कोरडा आहार पुरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.- डाॅ. दुर्योधन चव्हाण, आरोग्य उपसंचालक, मुंबई

जिल्ह्यातील क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी ‘निक्षय मित्र’ जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहीमेत आरोग्य उपसंचालक डाॅ. दुर्योधन चव्हाण यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यातील ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. त्यांचा हा पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.- डाॅ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम