शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

क्षयरुग्णांसाठी ‘दुर्योधन’ आले धावून; झाले निक्षय मित्र; वर्षभर पुरविणार कोरडा आहार

By सुनील काकडे | Updated: September 30, 2023 14:33 IST

जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे;

वाशिम : क्षयरोगमुक्त भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता शासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांना ‘निक्षय मित्र’ बनून कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या महत्वाकांक्षी मोहीमेत आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी देखील सहभाग घेतला असून स्वत: निक्षय मित्र बनून मानोरा तालुक्यातील ४ क्षयरुग्णांना त्यांनी २८ सप्टेंबर रोजी दत्तक घेतले.

९ सप्टेंबर २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’ या महत्वाकांक्षी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. गोरगरिब कुटूंबातील ज्या व्यक्तींना क्षयरोगाने ग्रासले आहे, ते केवळ पैशांअभावी आवश्यक असलेला कोरडा आहार घेवू शकत नाहीत. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढे येवून गरजू क्षयरुग्णांना दत्तक घेत कोरडा आहार पुरवावा, याबाबत प्रभावी जनजागृती केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे; तर उर्वरित ५२८ क्षयरुग्णांना निक्षय मित्राची प्रतिक्षा लागून आहे. यादरम्यान २८ सप्टेंबर रोजी आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. सोबतच पुढील वर्षभरासाठी निक्षय मित्र बनून संबंधितांना पोषण आहाराची कीट देखील वितरित केली. जिल्ह्यातील दानशूरांनी या मोहीमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होवून क्षयरुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

चोंढी (ता.मानोरा) हे माझे मूळ गाव आहे. त्याठिकाणी सध्या सक्रीय असलेले आणि यापुढे आढळणारे सर्व क्षयरुग्ण मी स्वत: दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. निक्षय मित्र बनून कार्य करित असताना संबंधितांना कोरडा आहार पुरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.- डाॅ. दुर्योधन चव्हाण, आरोग्य उपसंचालक, मुंबई

जिल्ह्यातील क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी ‘निक्षय मित्र’ जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहीमेत आरोग्य उपसंचालक डाॅ. दुर्योधन चव्हाण यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यातील ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. त्यांचा हा पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.- डाॅ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम