शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनासमोर पीककर्ज पुनर्गठनाची कसरत!

By admin | Updated: July 10, 2015 01:23 IST

सहा दिवस शिल्लक; वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ.

वाशिम : पीककर्ज पुनर्गठनाची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असताना, अद्यापही ३0 टक्के पीककर्जाचे पुनर्गठण होणे बाकी आहे. सहा दिवसात पीककर्ज पुनर्गठनाचा आकडा पूर्ण करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे. दुसरीकडे पीककर्ज रुपांतरण समाधानकारक होत आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत; मात्र या निर्देशांची अंमलबजावणी योग्य प्रकारे वाशिम जिल्ह्यात होत नसल्याची परिस्थिती आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ९९ हजार १९४ शेतकरी सभासदांनी एकूण ६६३ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचा लाभ घेतला होता. या शेतकर्‍यांना पीककर्ज पुनर्गठनाचा लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. पुनर्गठनास नकार देणार्‍या बँक प्रशासनाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. १५ जुलैपर्यंंत पुनर्गठन केले जाणार आहे. ६ जुलैपर्यंंत विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी २९ हजार १२६ शेतकरी लाभार्थींना १७६.३८ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने १५८ शेतकर्‍यांचे १८.६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने १९५ शेतकर्‍यांचे १८.७ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ७४९ शेतकर्‍यांचे ५५.९ लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने २११२ शेतकर्‍यांचे १.८६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने ३८६ शेतकर्‍यांचे २९ लाख, एसडीएफसी बँकेने २१२ शेतकर्‍यांचे ३७.४ लाख, डीसीसी बँकेने २0 हजार ३६८ शेतकर्‍यांचे १0९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठण, अशी आकडेवारी आहे. दरम्यान कर्ज रुपांतरणाचा आकडा १६९ कोटींवर गेला आहे. १७ हजार ७0४ शेतकर्‍यांनी कर्ज रुपांतरणाचा लाभ घेतला आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ-कोकण ग्रामीण बँकांमध्ये सन २0१४-१५ च्या पीक कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया १५ जुलै २0१५ पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रुपांतरणबाबत रिझर्व्ह बँक व नाबार्ड कडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी दिली.