शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

प्रशासनासमोर पीककर्ज पुनर्गठनाची कसरत!

By admin | Updated: July 10, 2015 01:23 IST

सहा दिवस शिल्लक; वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ.

वाशिम : पीककर्ज पुनर्गठनाची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असताना, अद्यापही ३0 टक्के पीककर्जाचे पुनर्गठण होणे बाकी आहे. सहा दिवसात पीककर्ज पुनर्गठनाचा आकडा पूर्ण करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे. दुसरीकडे पीककर्ज रुपांतरण समाधानकारक होत आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत; मात्र या निर्देशांची अंमलबजावणी योग्य प्रकारे वाशिम जिल्ह्यात होत नसल्याची परिस्थिती आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ९९ हजार १९४ शेतकरी सभासदांनी एकूण ६६३ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचा लाभ घेतला होता. या शेतकर्‍यांना पीककर्ज पुनर्गठनाचा लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. पुनर्गठनास नकार देणार्‍या बँक प्रशासनाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. १५ जुलैपर्यंंत पुनर्गठन केले जाणार आहे. ६ जुलैपर्यंंत विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी २९ हजार १२६ शेतकरी लाभार्थींना १७६.३८ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने १५८ शेतकर्‍यांचे १८.६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने १९५ शेतकर्‍यांचे १८.७ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ७४९ शेतकर्‍यांचे ५५.९ लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने २११२ शेतकर्‍यांचे १.८६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने ३८६ शेतकर्‍यांचे २९ लाख, एसडीएफसी बँकेने २१२ शेतकर्‍यांचे ३७.४ लाख, डीसीसी बँकेने २0 हजार ३६८ शेतकर्‍यांचे १0९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठण, अशी आकडेवारी आहे. दरम्यान कर्ज रुपांतरणाचा आकडा १६९ कोटींवर गेला आहे. १७ हजार ७0४ शेतकर्‍यांनी कर्ज रुपांतरणाचा लाभ घेतला आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ-कोकण ग्रामीण बँकांमध्ये सन २0१४-१५ च्या पीक कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया १५ जुलै २0१५ पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रुपांतरणबाबत रिझर्व्ह बँक व नाबार्ड कडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी दिली.