शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:15 IST

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या ...

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन अन्यथा संप

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या उपरोक्त मागण्या पूर्ण करा अन्यथा येत्या दोन २ नोव्हेंबरपासून आमचे कृषी निष्ष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवणार असल्याचे निवेदन मंगरुळपीर तालुका कृषी व्यावसायीक संघटनेने येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,कृषी अधिकारी व ठाणेदारांना ३१ आॅक्टोंबर रोजी दिले.

शेतकरी व शेतमजूरांचे पिकावर फवारणी करतांना व चुकीच्या पध्दतीने फवारणीमुळे किटकनाशक औषधामुळे विषबाधा होवुन मृत्यु झाल्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झाल्यात आणि या सर्व प्रकाराला केवळ कृषी निविष्ठा  विक्रेतचे दोषी असल्याचा प्रचार ,प्रसार विविध राजकीय संघटनांकडून केल्या जात आहे. त्यामुळे कृषी विक्रेत्यांस जबाबदार धरुन त्यांचेवर कृषी विभागामार्फत  पोलिस कारवाई,विक्री परवाना रद्द करणे , विक्री बंद आदेश देणे अशा गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहेत. अशा परिस्थिती मध्ये आम्ही आमचे व्यवसाय कसे करावे असे निवेदनात नमुद असुन  प्रशासनाने आमच्या मागण्याची पुर्तता करावी यामध्ये ज्या कृषी निविष्ठा  विक्रेत्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात याव. तसेच े विक्री परवाने पुर्ववत देण्यात यावे, आॅनलाइृन परवान्यात समाविष्ठ केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये किटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यात करीता मुदत देण्यात यावी, शासनाकडून सर्व किटकनाशक,उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र कृ षी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. कृषी विक्रेत्याकडील बियाणे, किटकनाशके व खते यांचे हस्तलिखीत साठा ऐवजी संगणकीय पध्दतीने ठेवण्यात आलेले साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे व इतर मागण्याकडे शासनाने विचार करुन मांगण्याची पुर्तता करावी अशी मागणी केली आहे. यावेळी येथील उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी कृषी सेवा संचालकांना शेतकºयांना औषधे देतांना नियमावलीचे परिपत्रक देण्याचे सांगितले तर तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके यांनी तहसील कार्यालयातच कृषी सेवा संचालकांची बैठक होवुन काही  बाबींबद्दल माहिती देवुन कृषी  निविष्ठा विक्रेते व शेतकरी  यांनी आपसामध्ये समन्वय साधावे जेणे करुन  पुढे होणाºया घटनांवर अंकुश बसणार असल्याचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके  यांनी बैठकीत सांगितले. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष देवा राठोड, सचिव शारिक शेख, अनिल बाहेती,  दत्ताभाऊ भेराणे, बबलु बाहेती, रवि आसावा,  संतोष बियाणे, नरेश ठाकरे, अनिल पोटकटारे, हरिष पवार, गोपाल म्हातारमारे, निलेश राऊत, अमोल सावदे, अंकुश मोटे, राजु भांगडीया, ठाकरे यांचेसह तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ष्ठ विक्रेत्यांच्या निवेदनावर स्वाक्षºया असुन ते उपस्थित होते.