शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हताश शेतक-यांना समुपदेशनातून दिला जाणार धीर!

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

आत्महत्या कमी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात उपाययोजना.

संतोष येलकर/अकोलाशेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्‍यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकी आणि कर्जापायी विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक धीर देण्याची उपाययोजना अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कमी पीक उत्पादन झालेल्या आणि नैराश्याचे वातावरण असलेल्या गावांमध्ये शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. लोकमत प्रतिनिधीशी बोलताना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांमधील नैराश्याचे वातावरण नाहिसे करण्याकरिता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. *गाव पातळीवर होणार समुपदेशन!नैराश्यात सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.*असे होणार समुपदेशन!नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी समुपदेशनात समजून घेण्यात येणार आहेत. अडचणींवर मात करून, त्या सोडविण्याच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. अडचणींमुळे येणारी नैराश्याची भावना कमी करून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.