शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हताश शेतक-यांना समुपदेशनातून दिला जाणार धीर!

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

आत्महत्या कमी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात उपाययोजना.

संतोष येलकर/अकोलाशेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्‍यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकी आणि कर्जापायी विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक धीर देण्याची उपाययोजना अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कमी पीक उत्पादन झालेल्या आणि नैराश्याचे वातावरण असलेल्या गावांमध्ये शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. लोकमत प्रतिनिधीशी बोलताना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांमधील नैराश्याचे वातावरण नाहिसे करण्याकरिता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. *गाव पातळीवर होणार समुपदेशन!नैराश्यात सापडलेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.*असे होणार समुपदेशन!नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी समुपदेशनात समजून घेण्यात येणार आहेत. अडचणींवर मात करून, त्या सोडविण्याच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. अडचणींमुळे येणारी नैराश्याची भावना कमी करून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.