शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

अल्प पाण्यात फुलविली पपईची बाग

By admin | Updated: June 6, 2015 01:02 IST

तांदळी येथील शेतक-याची यशोगाथा; शासकीय अनुदान न घेता घालून दिला आदर्श.

कोंडाळा महाली (जि. वाशिम) : पाणीटंचाईच्या काळात कमी पाण्यावर तांदळी शेवई येथील शेतकर्‍याने पपईची बाग फुलविली आहे. विशेष म्हणजे या शेतकर्‍याने शासनाच्या कृषी विभागाचे अनुदान न घेता स्वखर्चातून पपईची बाग फुलवून, इतर शेतकर्‍यांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे. तांदळी शेवई येथील माजी उपसरपंच शेतीनिष्ठ कास्तकार दादाराव नरवाडे यांनी पाणीटंचाईच्या काळात सुध्दा ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यामध्ये २ एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड करुन जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नातून जिद्द, चिकाटीव्दारे त्यांनी परिस्थितीसमोर हार पत्करली नाही. दादाराव नरवाडे यांनी सोलापूर येथून पपईचे रोपे आणून ११ फेब्रुवारी २0१५ रोजी रोपे लावली. रोपाचा खर्च २२ हजार रुपये कमी खर्चाचा चायना ठिंबक नळया पाईप खर्च १0,000 रुपये तसेच रोही, रानडुकर, हरिण वगैरे वन्य प्राण्यापासून तार कंपाऊंड खर्च ४५ हजार रुपये रासायनिक खताचा खर्च १५ हजार रुपये व इतर खर्च १५ हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांच्या जवळ त्यांनी खर्च केलेला आहे. सध्या त्यांची पपई फुल व फळ धारणेच्या अवस्थेमध्ये आहे. पावसाळा लांबला तर पाण्याचे अतिरिक्त नियोजनही त्यांनी केले आहे.