शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सौरपंपाच्या ८४९पैकी ६९९ अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:41 IST

वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने शासनाने नव्या कृषी धोरणाचा अवलंब केला आहे. यासाठी जिल्हाभरातील ८४९ शेतकऱ्यांनी अर्ज ...

वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने शासनाने नव्या कृषी धोरणाचा अवलंब केला आहे. यासाठी जिल्हाभरातील ८४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना, ३ मार्चपर्यंत त्यापैकी केवळ १५० अर्जांना महावितरणकडून मंजुरी देण्यात आली, तर निकषात न बसल्याने ६९९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आधीच पारंपरिक वीज जोडणीपासून वंचित असताना आता सौरपंपही मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

पुढील तीन वर्षात ग्राहक आणि शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता, सर्व कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी दिवसा ८ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार नवीन सर्वंकष कृषी वीज धोरण २०२० नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या धोरणात विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषणविरहीत सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यासाठी ४४४ सौरपंपांचा कोटा निर्धारित करण्यात आला असून, जिल्ह्यातील ८४९ शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, योजनेच्या निकषात न बसल्याने ६९९ अर्ज रद्द करण्यात आले, तर केवळ १५० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

-------------------

सौर कृषिपंप योजनेचे निकष

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्याकडे पारंपरिक वीज जोडणी नाही, ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, वीजजोडणीसाठी पैसे भरूनही विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी तसेच वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, नदी, विहीर, कुपनलिका, शेजारी शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

-------------------

वाशिम जिल्ह्यासाठी ४४४ सौरपंपांचा कोटा

शासनाच्या नव्या कृषी धोरणांतर्गत शेतकऱ्यांच्या वीज जोडणीची समस्या सोडविण्यासाठी पारेषणविरहीत सौर कृषिपंप जोडणीचा पर्याय ऊर्जा विभागाने उपलब्ध करून दिला आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी सौर कृषिपंपांचा स्वतंत्र कोटा निर्धारित करण्यात आला असून, पारंपरिक कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता ४४४ सौर कृषिपंपाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

-----------

मंजूर अर्जांची तालुकानिहाय संख्या

तालुका मंजूर अर्ज

रिसोड ८६

मालेगाव ४९

मानोरा ०७

मंगरुळपीर ०६

कारंजा ०२

-------------------

कोट: सद्यस्थितीत सौर कृषिपंप जोडणीसाठी पूर्वी पारंपरिक वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या आणि न भरलेल्या शेतकऱ्यांचेही अर्ज स्वीकारले जात आहेत. निकषानुसारच शेतकऱ्यांना सौरपंप जोडणी मंजूर केली जात आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त कोटा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

- आर. जी. तायडे,

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम