शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

बियाण्यांसाठी ३४ हजार अर्जांतून २४९८ शेतकऱ्यांचेच नशीब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

वाशिम : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, ...

वाशिम : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनुदानित बियाण्यांसाठी अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ २४९८ शेतकऱ्यांनाच ‘लॉटरी’ लागली असून, उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शीर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोयाबीन बियाण्यांसाठी २७५९८, तूर ५८८८, मूग ४४७, तर उडीद बियाण्यांसाठी १९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ३४ हजारांवर अर्ज आल्याने अनुदानित बियाणे नेमके कुणाला मिळणार? असा प्रश्न पडला होता. लॉटरी पद्धतीतून २४९८ शेतकऱ्यांची निवड झाली असून, या शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले जात आहे.

००००००००००००

अनुदानित बियाण्यांसाठी आलेले अर्ज - ३४,१२८

लॉटरी किती जणांना - २,४९८

.......

कोणत्या तालुक्यात किती

तालुकालाभार्थी

वाशिम ४६६

ािरसोड १३६

मालेगाव ३३०

मंगरूळपीर ८७८

मानोरा ६८८

कारंजा ७९०

००००००००००००००

महागडे बियाणे कसे परवडणार?

प्रतिक्रिया..

महागाईने कळस गाठला !

शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे लागवड खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. यंदा विविध बियाण्यांच्या किमतीही वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे.

- सुखदेव वानखडे, शेतकरी

......

शेतमालाच्या किमतीही वाढवाव्या !

खते, बियाण्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत शेतमालाच्या किमतीत वाढ होत नाही. महागडे बियाणे परवडणारे नसून, बियाण्याच्या किमती कमी कशा होतील? याचाही विचार शासनाने करायला हवा.

- आकातराव सरनाईक, शेतकरी.

.......

सरसकट बियाणे मिळावे !

अनुदानित बियाणे वाटप करताना कोणताही भेदभाव न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट अनुदानित बियाण्याचा लाभ मिळायला हवा. अनुदानित बियाण्याचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांना मिळणार असल्याने उर्वरित शेतकरी वंचितच राहतील.

- विनोद सरकटे, शेतकरी

००००००००