शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड संथगतीने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 12:21 IST

Washim News आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात ४७५ गावांतील १७२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.शेतीच्या उत्पादनात वाढ करणे, पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ करणे, फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देशातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड केली जाते. सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात ४७५ गावांमधील १७२० हेक्टर क्षेत्रफळावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. आतापर्यंत १३३७ शेतकरी तसेच ११६६.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी १०३९.१४ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक, तर ८३८.४९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत यापैकी ४२० शेतकऱ्यांनी ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड केली. वाशिम तालुक्यातील ५६ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ८५ शेतकरी तसेच ७५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी तीन हेक्टरवर फळबाग लागवड केली. रिसोड तालुक्यातील ७८ गावात २२० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३१० शेतकरी तसेच २५७ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ २८ शेतकऱ्यांनी २४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मानोरा तालुक्यातील ४१ गावांत २२० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२३ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी ७८ शेतकऱ्यांनी ७२ हेक्टरवर फळबाग लागवड केली. कारंजा तालुक्यातील १६५ गावांत ३४० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२१.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ ३० शेतकऱ्यांनी ३० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

मालेगाव, मंगरूळपीर तालुका आघाडीवरफळबाग लागवडीत मालेगाव व मंगरूळपीर तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील ५२ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३२० शेतकरी तसेच २६५.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. २६५.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २४४.१९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १२२ शेतकºयांनी ११० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मंगरूळपीर तालुक्यातील ८३ गावात ३४० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३६६ शेतकरी तसेच ३२४.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. ३२४.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २६९.४ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १५९ शेतकºयांनी १३४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना