शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या ...

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या खाजगी ट्रॅव्हल्सना नियम पाळण्याच्या अटीखाली प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. याअंतर्गत वाशिममार्गे, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई आदी महानगरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या २० ट्रॅव्हल्स सुरू आहेत. त्यात प्रवास करणाऱ्या अनेकांकडून मात्र तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासह कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचा आकडाही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडाला नियमित मास्क लावणे, हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार धुऊन स्वच्छ करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासह इतरही नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियम पाळण्याचे आवाहन केले जात असताना प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

....................

रोज शहरातून जाणाऱ्या व येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २०

प्रवाशांची संख्या - ५००

.....................

(बॉक्स)

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या वाशिममार्गे मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांमध्ये ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. विदर्भ, चिंतामणीसह इतरही कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स सुरू आहेत. दरम्यान, काही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन पाहणी केली असता बहुतांश प्रवासी विनामास्क आढळून आले. गर्मीच्या त्रासापासून बचाव व्हावा म्हणून मास्क नाही लावला, असे काही जणांनी सांगितले, तर सॅनिटायझरचा वापरही होत नसल्याचे दिसून आले.

...............

(बॉक्स)

एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

पुणे, मुंबई, नाशिक यासह इतर महानगरांमध्ये वाशिममधून जाणाऱ्यांची संख्या सध्या नगण्य आहे. बाहेर जिल्ह्यातील प्रवाशांची संख्याही जेमतेम असते. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्रीचा प्रवास करतात. प्रवाशांकडून नियम पाळले जात नसले तरी एकाही ट्रॅव्हल्सवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

...............

(बॉक्स)

ई-पास नसणाऱ्यांची चाैकशीच नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जवळ प्रशासनाकडून दिला जाणारा ई-पास बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकी वाहने थांबवून पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणीही केली जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्समधून विना ई-पास प्रवास करणाऱ्यांची चाैकशीही केली जात नसल्याचे दिसून येत आहे.