शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा केवळ सोपस्कार.

By admin | Updated: April 16, 2015 01:29 IST

पाहणीनंतर सादर होईल अंतिम अहवाल ; अवकाळी पाऊस सुरूच.

वाशिम : जिल्ह्यात ९ ते १२ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे विशेषत: फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात ७७0 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ८ एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नेमके किती शेतकर्‍यांच्या पिकांचे व क्षेत्रफळाचे नुकसान झाले, याचा अहवाल अद्याप सादर करण्यात आला नसून, केवळ नुकसान पाहणीचा सोपस्कार पार पाडून प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहेत. ९ ते १२ एप्रिल दरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने जिल्ह्यातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला. त्यामध्ये वाशिम तालुक्यात १२५ हेक्टर, रिसोड २३२ हेक्टर, कारंजा ५0, मानोरा ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या भागातील बर्‍याच नुकसानग्रस्तांना अद्याप भेट देण्यात आली नाही. कारंजा तालुक्यातील १0९ घरांची पडझड झाली, तर कांदा व केळी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या भागात तहसीलदार चेतन गिरासे यांच्या चमूने भेट दिली असून उर्वरित पाहणी सुरू आहे. मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या चार गावांतील पंचनामे केवळ पूर्ण झाले असून, उर्वरीत गावांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. यासंदर्भात संबधितांशी संपर्क केला असता सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाच्या निश्‍चितीबाबत माहिती हाती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.