शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा केवळ सोपस्कार.

By admin | Updated: April 16, 2015 01:29 IST

पाहणीनंतर सादर होईल अंतिम अहवाल ; अवकाळी पाऊस सुरूच.

वाशिम : जिल्ह्यात ९ ते १२ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे विशेषत: फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात ७७0 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ८ एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नेमके किती शेतकर्‍यांच्या पिकांचे व क्षेत्रफळाचे नुकसान झाले, याचा अहवाल अद्याप सादर करण्यात आला नसून, केवळ नुकसान पाहणीचा सोपस्कार पार पाडून प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहेत. ९ ते १२ एप्रिल दरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने जिल्ह्यातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला. त्यामध्ये वाशिम तालुक्यात १२५ हेक्टर, रिसोड २३२ हेक्टर, कारंजा ५0, मानोरा ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या भागातील बर्‍याच नुकसानग्रस्तांना अद्याप भेट देण्यात आली नाही. कारंजा तालुक्यातील १0९ घरांची पडझड झाली, तर कांदा व केळी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या भागात तहसीलदार चेतन गिरासे यांच्या चमूने भेट दिली असून उर्वरित पाहणी सुरू आहे. मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या चार गावांतील पंचनामे केवळ पूर्ण झाले असून, उर्वरीत गावांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. यासंदर्भात संबधितांशी संपर्क केला असता सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाच्या निश्‍चितीबाबत माहिती हाती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.