शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

वाशिम जिल्ह्यात केवळ ७0 एकरवर रेशीम शेती!

By admin | Updated: March 6, 2017 02:32 IST

‘मनरेगा’तून भरघोस अनुदान; मात्र बाजारपेठेअभावी शेतक-यांमध्ये उदासिनता.

वाशिम, दि. ५- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून प्रति एकर १ लाख ९२ हजार रुपये अनुदान मिळत असतानाही जिल्हयात आजपर्यंत केवळ ७0 एकरापर्यंत रेशीम शेती उभी राहू शकली. तथापि, रेशीम कोष विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसणे, प्रक्रिया उद्योगांचा अभाव आणि शासनाच्या तकलादू हमीभावामुळेच रेशीम शेतीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे एकंदर चित्र आहे. अत्यंत कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाला मान्यता मिळाली आहे; मात्र यासंबंधी प्रभावी जनजागृती नसल्यामुळे जिल्ह्यात हा उद्योग तग धरू शकला नाही. येथील रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत जिल्ह्यातील ४४ शेतकर्‍यांच्या केवळ ६३.५ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड असून हे शेतकरी रेशीम कोष उत्पादन घेतात. मात्र या कोषांच्या विक्रीसाठी अद्याप हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. तसेच शासनाकडून रेशीम कोषाला मिळणारा दर प्रतिकिलो केवळ १८0 रुपये आहे. रेशीम कोषावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग महाराष्ट्रात अद्याप उभा राहू शकला नाही अथवा कोष विक्रीकरिता राज्यात कुठेच बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये या उद्योगाप्रती उदासिनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून १.९२ लाख रुपये अनुदानाची तरतूद!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून तुती लागवड करणार्‍या शेतकर्‍यास अकुशल मजूरीपोटी तीन वर्षांत १ लाख ३0 हजार ९४४ रुपये अनुदान दिले जाते. यासह पहिल्या वर्षी शेणखत, तुती रोपे, चंद्रीका-१00, प्लास्टिक ट्रे-१0, नायलॉन जाळी-४, गटूर स्प्रे पंप, औषधीसाठी ३२ हजार १६0 रुपये, दुसर्‍या वर्षी ब्रशकटर, जैविक खते, पोषण औषधी, निर्जंतुकीकरण पावडर आदिंसाठी १९ हजार २८५ आणि तिसर्‍या वर्षी जैविक खते व निर्जंतुकीकरण पावडरकरिता १0 हजार २८५, असे ६१ हजार ७३0 रुपये अनुदान दिले जाते. असे असताना रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडून योग्य जनजागृती नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून अद्याप अनभिज्ञ असल्याने रेशीम शेतीचे प्रमाण ह्यजैसे थेह्ण असल्याची स्थिती आहे.