शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:43 IST

जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे. यासाठी ३० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय स्तरावर प्रस्तावही पाठविले; परंतु सद्यस्थितीत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर पाच प्रस्ताव त्रुटीमुळे रखडले आहेत. वाशिम जिल्ह्याची भुजल पातळी सव्वा मीटरने खालावली असताना विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तीन मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे, तर १०९ लघू प्रकल्पापैकी जेमतेम ६० प्रकल्पांत मृतसाठा उरला आहे. त्यामुळे रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या सहाही तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. त्यामुळे संंबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय अधिका-यांकडे विहिरी, कूपनलिका अधिग्रहणासह टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात टँकरच्या प्रस्तावांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे. तथापि, उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील केवळ १६ प्रस्तावांनाच अंतिम मंजुरी मिळाली आहे, तर ८ पैकी ५ प्रस्ताव त्रुटीअभावी रखडले आहेत. पाणीटंचाई निवारणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.--------------------१० गावांत टँकरच्या २८ खेपा जिल्हास्तवरून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष १० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून, यात वाशिम तालुक्यातील बाभुळगाव येथे ५ हजार लीटर टँकरच्या १० खेपा, रिसोड तालुक्यातील करंजी येथे ५ हजार लीटरच्या ५ खेपा, मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे येथे २४ हजार लीटरच्या ४ खेपा, धानोरा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा,मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर येथे २४ हजार लीटरच्या दोन आणि गलमगाव येथे १२ हजार लीटरची एक, कारंजा तालुक्यात्ील दादगाव आणि धोत्रा देशमुख येथे २४ हजार लीटरची प्रत्येकी एक, तर गिर्डा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, अशा प्रमाणात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करून तहान भागविण्याचा प्रयत्न होत आहे.