शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:43 IST

जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे. यासाठी ३० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय स्तरावर प्रस्तावही पाठविले; परंतु सद्यस्थितीत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर पाच प्रस्ताव त्रुटीमुळे रखडले आहेत. वाशिम जिल्ह्याची भुजल पातळी सव्वा मीटरने खालावली असताना विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तीन मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे, तर १०९ लघू प्रकल्पापैकी जेमतेम ६० प्रकल्पांत मृतसाठा उरला आहे. त्यामुळे रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या सहाही तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. त्यामुळे संंबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय अधिका-यांकडे विहिरी, कूपनलिका अधिग्रहणासह टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात टँकरच्या प्रस्तावांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे. तथापि, उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील केवळ १६ प्रस्तावांनाच अंतिम मंजुरी मिळाली आहे, तर ८ पैकी ५ प्रस्ताव त्रुटीअभावी रखडले आहेत. पाणीटंचाई निवारणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.--------------------१० गावांत टँकरच्या २८ खेपा जिल्हास्तवरून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष १० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून, यात वाशिम तालुक्यातील बाभुळगाव येथे ५ हजार लीटर टँकरच्या १० खेपा, रिसोड तालुक्यातील करंजी येथे ५ हजार लीटरच्या ५ खेपा, मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे येथे २४ हजार लीटरच्या ४ खेपा, धानोरा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा,मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर येथे २४ हजार लीटरच्या दोन आणि गलमगाव येथे १२ हजार लीटरची एक, कारंजा तालुक्यात्ील दादगाव आणि धोत्रा देशमुख येथे २४ हजार लीटरची प्रत्येकी एक, तर गिर्डा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, अशा प्रमाणात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करून तहान भागविण्याचा प्रयत्न होत आहे.