शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिममध्ये १ नोव्हेंबरपासून ‘आॅनलाईन’ नोंदणीस होणार प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:03 IST

१ नोव्हेंबरपासून शेतकºयांच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस सुरूवात होत असल्याची माहिती सभापती वामनराव महाले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोयाबिन, मूग आणि उडीद या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकºयांना ‘नाफेड’कडे आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनने वाशिम तालुका खरेदी-विक्री संघास परवानगी दिली आहे. त्यानुसार, १ नोव्हेंबरपासून शेतकºयांच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस सुरूवात होत असल्याची माहिती सभापती वामनराव महाले यांनी दिली.वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने गतवर्षी हमीदराने खरेदी केलेल्या तूर, हरभरा, सोयाबिन या शेतमालापोटी शेतकºयांना देय असलेले चुकारे काही कारणास्तव प्रलंबित होते. दरम्यान, संस्थेचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव इंगोले यांनी वरिष्ठ पातळीवर सलग पाठपुरावा केल्याने शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरू झाले आहे. त्यामुळे आता नव्याने शेतकºयांनी मनात कुठलाही संभ्रम न ठेवता तालुका खरेदी-विक्री संघाकडे शेतमालाची ‘आॅनलाईन’ नोंदणी करून त्यानुसार माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन इंगोले यांनी केले. दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी आमदार लखन मलिक यांच्याहस्ते ‘आॅनलाईन’ नोंदणीस रितसर सुरूवात होणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बंडू महाले, भाजपाचे शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे, नारायणराव वानखेडे, शिवाजी वाणी आदिंची उपस्थिती राहणार आहे. शेतकºयांनीही यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती