शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
3
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
4
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
5
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
6
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
7
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
8
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
9
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
10
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
11
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
12
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
13
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
15
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
16
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
17
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
18
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
19
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
20
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने एक हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:36 IST

पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सततचे ढगाळ वातावरण व पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले. त्याचा परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला. त्यामुळे एक हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पिक बाधित झाले आहे. पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा ४ लाख ६ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन असताना ३ लाख ९३ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होऊ शकली आहे. त्यात सोयाबीन पेरणी ३ लाख ४१७ हेक्टरवर अपेक्षीत असताना २ लाख ९२ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ७५ टक्क्यांहून अधिक आहे. शेतकरी या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यात यंदा निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरच्या पोषक वातावरणामुळे हे पीक बहरले; परंतु या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत असतानाच जिल्ह्यात १० आॅगस्टपासून सतत ढगाळ वातावरण व पाऊस पडू लागला. त्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी पानांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा निर्माण झाली. जमिनीत पाणी व हवा याचे विषम प्रमाण झाले. मूळांची शोषणक्रिया बंद पडली आणि पिकावर पांढºया माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला, तसेच जमिनीत असणाºया विषाणूला पोषक वातावरण मिळाल्याने पाने पिवळी पडू लागली. जमिनीत असणाले शिष्ट, निमॅटोडसमुळे पिकास अन्नद्रव्य शोषूण घेण्यात अडचणी निर्माण होऊन पाने पिवळी पडली आहेत. जिल्ह्यात एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सततचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सोयाबीन पीक बाधित झाले आहे. त्यात प्रामुख्याने रिसोड तालुक्यात २३०, मालेगाव तालुक्यात २५०, वाशिम तालुक्यात १८०, तर मंगरुळपीर तालुक्यात १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बीज प्रक्रिया, बीबीएफ पेरणी, पाणी न साचणाºया जमिनीत प्रादूर्भाव नाहीजिल्ह्यात यंदाच्या हंगामात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक पिवळे पडून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया केली, अशा ठिकाणी, तसेच पाणी न साचणाºया जमिनीत आणि बीबीएफ यंत्राने केलेल्या पेरणीच्या क्षेत्रात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा सोयाबीनच्या पिकावर कोणताही विपरित परिणाम झाला नसून, या अशा ठिकाणच्या सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम आहे, हे विशेष.

ज्या शेतकºयांच्या शेतात पाणी साचल्याने पीक पिवळे पडले, त्या भागांत पाहणी करून मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात येतील. तथापि, पूर्णपणे पिवळे पडलेल्या आणि बुरशीमुळे मूळा कुजलेल्या क्षेत्रातील सोयाबीन पिकाची स्थिती सुधारणे अशक्य आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती