शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती

By सुनील काकडे | Updated: October 21, 2023 15:10 IST

पोलिस-जनता सलोखा कार्यक्रम

सुनील काकडे

वाशिम : नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून त्या सोडविता याव्या. यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यानुषंगाने गत ५ महिन्यांमध्ये पोलिस दलाने चार विशेष शिबीरे घेवून ५८४ नागरिकांच्या तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा केला. अशाप्रकारे तत्काळ न्याय मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अन्यायग्रस्त नागरिकांना तक्रार निवारणासाठी पोलिस स्टेशनमध्ये सतत चकरा माराव्या लागू नये, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढून तक्रारींचे विनाविलंब निवारण व्हावे, या हेतूने शिबीरांची संकल्पना पुढे आली. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

याअंतर्गत चालूवर्षी ५ जून रोजीला आयोजित शिबिरात २३१, २५ जुलै रोजी ८४, २६ ऑगस्टला २१३ आणि तीन दिवसांपूर्वी, १८ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या शिबिरातून ५६ अशा एकंदरित ५८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.पोलिसांवरील ताणही तुलनेने झाला कमी

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आणि पोलिस स्टेशन स्तरावर विविध स्वरूपातील तक्रारी प्रलंबित राहतात. त्या निकाली काढण्यासाठी तक्रारदारांकडून तगादा लावला जातो. मात्र, आता प्रत्येक महिन्यांत शिबीर घेवून तक्रारी निकाली निघत असल्याने तक्रारदारांचे समाधान होण्यासोबतच पोलिसांवरील ताणही तुलनेने कमी झाला आहे.

नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, अडचणींच्या निवारणासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्यावी. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.- बच्चन सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम