शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पूर्वपरवानगीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यास मनाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:29 IST

गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयात येता येणार नाही, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. 

ठळक मुद्देअधिकाºयांना आढावा बैठकीसाठी बोलाविणे अत्यंत आवश्यक असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय बोलाविता येणार नाही. जिल्हा परिषदमधील इतर कर्मचारी शासकीय कामकाज नसताना, त्यांचे कार्यालय सोडून जिल्हा परिषदमधील कार्यालयात फिरताना आढळून येतात.

 

वाशिम - गटस्तरावरील कामकाजात खोळंबा निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी, विभाग प्रमुख व अन्य कर्मचाºयांना यापुढे जिल्हा परिषद मुख्यालयात आवश्यक असलेल्या बैठकीसाठी बोलाविताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयात येता येणार नाही, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. 

वाशिम जिल्हा परिषद मुख्यालयात एकूण १५ विभाग असून, गटविकास अधिकारी, पंचायत समिती स्तरावरील खाते प्रमुखांना जिल्हा परिषद मुख्यालयात कोणत्याही बैठकीसाठी बोलाविण्यात येते. यामुळे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांना गटस्तरावरील विकास कामांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम विकास कामांवर होतो. यापुढे गटविकास अधिकाºयांना आढावा बैठकीसाठी बोलाविणे अत्यंत आवश्यक असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय बोलाविता येणार नाही. 

तसेच गट स्तरावरील बरेचसे गट क व गट ड संवर्गातील कर्मचारी हे रोज जिल्हा परिषद मुख्यालयात फिरताना निदर्शनात आले. त्यामुळे नियमित टपाल घेऊन येणाºया गट ड कर्मचाºयांव्यतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यास जिल्हा परिषद मुख्यालयात पाठविण्यात येऊ नये, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी केल्या. 

गटस्तरावरील कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषदमधील इतर कर्मचारी शासकीय कामकाज नसताना, त्यांचे कार्यालय सोडून जिल्हा परिषदमधील कार्यालयात फिरताना आढळून येतात. यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होऊन ‘पेंडन्सी’चे प्रमाण वाढीस लागते. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या या अनावश्यक फिरतीवर निर्बंध आणले आहेत. यापुढे गट स्तरावरील वर्ग तीन व चारच्या कोणत्याही कर्मचाºयास जिल्हा परिषद मुख्यालयात कोणत्याही प्रकारचे शासकीय कामकाजाकरिता येणे आवश्यक असल्यास त्याबाबत गटस्तरावरील गटविकास अधिकारी किंवा विभाग प्रमुखांकडून टिप्पणी मंजूर करून दौºयावर पाठवावे तसेच ज्या कामाकरिता दौºयावर ज्या विभागामध्ये आले असतील, ते काम करून परत कधी गेले याबाबत संबंधित कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, संबंधित कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. सदर प्रमाणपत्र असल्याशिवाय संबंधितांचे वेतन व भत्ते अदा करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. 

पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांनी कोणत्याही वर्ग तीन व चारच्या कर्मचाºयास किरकोळ कारणासाठी मुख्यालयांत पाठवू नये, अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास सदरच्या कर्मचाऱ्यांस परवानगीसह पाठविण्यात यावे तसेच जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांनी यासंदर्भात कार्यालयात नोंदवही ठेवून कामानिमित्त आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घ्यावी, अशा सूचना देतानाच कर्तव्यात दिरंगाई करणाºयांविरूद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ मधील तरतुदीनुसार एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद