शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

ओबीसी वित्त, विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 16:22 IST

वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही वर्षांमध्ये लाभार्थींना दिलेली कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज मिळणे अशक्य झाल्याने थकबाकीचा आकडा चार कोटींपेक्षा अधिक झाला. त्यातुलनेत वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाकडून प्रामुख्याने २० टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत कर्ज आणि राज्य महामंडळांतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येते. इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामीण बँक व अग्रणी बँकेने पुरस्कृत केलेल्या बँकांच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा केला जातो. त्यानुसार, गेल्या ८ ते १० वर्षात सुमारे ४ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले; मात्र अधिकांश लाभार्थींनी कर्जाच्या मूळ रकमेसह त्यावरील व्याजाचीही परतफेड न केल्याने ओबीसी वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. परिणामी, पुर्वी प्रतिवर्षी १०० पेक्षा अधिक केसेसला मंजूरी मिळणाºया या महामंडळांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे प्रमाण अगदीच रोडावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तीन वर्षात केवळ ३८ प्रकरणांना मंजूरीयापूर्वी ज्या लाभार्थींना कर्ज दिले, त्यांच्याकडून मूळ रकमेसह त्यावरील व्याजही मिळणे दुरापास्त झाल्याने ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाने नव्याने कर्ज मंजूर करण्यासाठी विविध स्वरूपातील अटी लादल्या आहेत. त्याची पुर्तता करणे बोगस लाभार्थींना अशक्य असल्याने तीन वर्षांत केवळ ३८ कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. वाशिमच्या कार्यालयात एकच अधिकारी!ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम मनुष्यबळावरही झाल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील कार्यालयात जिल्हा व्यवस्थापक दर्जाचा एकमेव अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असून अन्य कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेले आहेत.

टॅग्स :washimवाशिम