शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ओबीसी प्रवर्गाच्या जागा रिक्त झाल्याचे आदेश धडकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:38 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेत जिल्हा ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२ (२) क नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारांसाठी २७ टक्के आरक्षण ठेवताना ते ५० टक्के मर्यादेत ठेवायला हवे असे नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, ४ मार्च रोजी ही याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निकालानुसार, राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त झाल्यासंदर्भात संबंधित सदस्यांना ९ मार्चपर्यंत आदेश बजाविण्यात यावे आणि तसा आदेश १० मार्चपर्यंत सादर करावा, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यानुसार जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील संबंधित १४ सदस्यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर हे प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठात नेण्याचे नियोजन केले जात असतानाच, शुक्रवारी उशिरा आलेल्या या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

0000

सर्वाधिक फटका वंचित बहुजन आघाडीला !

ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी सर्वाधिक वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेस तीन, भारतीय जनता पार्टी व जनविकास आघाडीच्या प्रत्येकी दोन, काॅंग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक आणि एका अपक्ष सदस्याचा यामध्ये समावेश आहे.

0000

ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सर्व जागा रिक्त झाल्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार संबंधित सदस्यांना नोटीस बजावण्यात येतील आणि राज्य निवडणूक आयोगाकडे वेळेत अहवाल सादर करण्यात येईल.

- सुनील विंचनकर

उपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

000

कारंजा, मानोरा पंचायत समिती सदस्यांना नो प्राॅब्लेम !

जिल्ह्यातील कारंजा व मानोरा पंचायत समितीची निवडणूक ही ५० टक्के आरक्षण मर्यादेतच पार पडली. त्यामुळे या दोन्ही पंचायत समितीमध्ये ओबीसी प्रवर्गातील सदस्यांच्या जागा मर्यादेपेक्षा अधिक नाहीत. उर्वरीत रिसोड, वाशिम, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार पंचायत समिती निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने ओबीसी प्रवर्गातील १९ जागा अतिरिक्त ठरल्या.