शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

लांबपल्ल्याच्या फेऱ्यांची संख्या घटली, प्रवाशांची गर्दी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ ...

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ बसफेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबईसह इतर महानगरांत एस. टी.ने प्रवास करणारे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत असून, स्थानिक बसगाड्यांत यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

वाशिम जिल्ह्यात गत दीड महिन्यातच ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याचा व्यवसायांवर फारसा परिणाम दिसत नसला तरी, एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर काही प्रमाणात प्रभाव पडला आहे. यामुळे एस. टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक , औरंगाबाद आदी महानगरात जाणाऱ्या प्रवाशांना टप्प्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढू लागली असून, यातून कोरोना संसर्गास अधिकच वाव मिळ्ण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------------

महानगरांत जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत

जिल्ह्यातील चारही आगारांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यात पाठविल्या जाणाऱ्या बसफेऱ्यांपैकी निम्म्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे उपरोक्त महानगरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली असून, हे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत आहेत. त्यामुळे त्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

----------------------

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग गुंडाळले

एकीकडे एस. टी.ची प्रवासी वाहतूक घटल्याने महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत, तर जिल्हांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजलेच आहेत, शिवाय वाहक, चालकांनीही कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

---------------------------

३२ कर्मचाऱ्यांना संसर्ग

दरदिवशी हजारो प्रवाशांना घेऊन या शहरातून त्या शहरात जाणाऱ्या चालक, वाहकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. बसस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्याची कोणतीही सुविधा नाही किंवा मास्क लावण्याबाबत तंबीही दिली जात नाही. यामुळे चालक, वाहकांचा जीव धोक्यात येत असून, जिल्ह्यातील चालक, वाहक मिळून ३२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

----------

जिल्ह्यातील बसगाड्यांची संख्या - २६५

रद्द केलेल्या बसगाड्यांची संख्या - २६

जिल्ह्यातील चालक -२७८

कामगिरीवरील चालक - २५२

जिल्ह्यातील वाहक - २९१

कामगिरीवरील चालक -२७५