शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

लांबपल्ल्याच्या फेऱ्यांची संख्या घटली, प्रवाशांची गर्दी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ ...

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ बसफेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबईसह इतर महानगरांत एस. टी.ने प्रवास करणारे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत असून, स्थानिक बसगाड्यांत यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

वाशिम जिल्ह्यात गत दीड महिन्यातच ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याचा व्यवसायांवर फारसा परिणाम दिसत नसला तरी, एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर काही प्रमाणात प्रभाव पडला आहे. यामुळे एस. टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक , औरंगाबाद आदी महानगरात जाणाऱ्या प्रवाशांना टप्प्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढू लागली असून, यातून कोरोना संसर्गास अधिकच वाव मिळ्ण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------------

महानगरांत जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत

जिल्ह्यातील चारही आगारांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यात पाठविल्या जाणाऱ्या बसफेऱ्यांपैकी निम्म्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे उपरोक्त महानगरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली असून, हे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत आहेत. त्यामुळे त्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

----------------------

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग गुंडाळले

एकीकडे एस. टी.ची प्रवासी वाहतूक घटल्याने महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत, तर जिल्हांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजलेच आहेत, शिवाय वाहक, चालकांनीही कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

---------------------------

३२ कर्मचाऱ्यांना संसर्ग

दरदिवशी हजारो प्रवाशांना घेऊन या शहरातून त्या शहरात जाणाऱ्या चालक, वाहकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. बसस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्याची कोणतीही सुविधा नाही किंवा मास्क लावण्याबाबत तंबीही दिली जात नाही. यामुळे चालक, वाहकांचा जीव धोक्यात येत असून, जिल्ह्यातील चालक, वाहक मिळून ३२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

----------

जिल्ह्यातील बसगाड्यांची संख्या - २६५

रद्द केलेल्या बसगाड्यांची संख्या - २६

जिल्ह्यातील चालक -२७८

कामगिरीवरील चालक - २५२

जिल्ह्यातील वाहक - २९१

कामगिरीवरील चालक -२७५