शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई कृषी समृद्धी महामार्गाची अधिसूचना जारी

By admin | Updated: September 16, 2016 03:04 IST

महामार्गाला विशेष राज्यमार्गाचा दर्जा ; भूूसंचयन पद्धतीमुळे होणार शेतक-यांचा फायदा

वाशिम, दि. १५- नागपूर-मुंबई कृषी समृद्धी महामार्गासाठीची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली असून, या महामार्गाला विशेष राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. नागपूर ते मुंबई दरम्यान विविध २४ कृषी समृद्धी केंद्रांना जोडणारा हा महामार्ग कृषी विकासाची व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर-मुंबई कृषी समृद्धी महामार्गासाठी भूसंचयन पद्धतीने जमीन घेऊन या विकास प्रकल्पात शेतकर्‍यांना भागीदारी देण्यात येणार आहे. महामार्गात भागीदार झालेल्या शेतकर्‍यांना जिरायती जमिनीकरिता त्या जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या २५ टक्के बिनशेती विकसित भूखंड व बागायती जमिनीकरिता जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३0 टक्के बिनशेती विकसित भूखंड कृषी समृद्धी केंद्रामध्ये देण्यात येणार आहे. जिरायत जमिनीच्या मोबदल्यात मिळणार्‍या भूखंडाची किंमत ६0 ते ६५ लाख रुपये प्रति हेक्टर तर बागायती जमिनीच्या मोबदल्यात मिळणार्‍या भूखंडाची किंमत ७0 ते ७५ लाख रुपये प्रति हेक्टर असणार आहे. कृषी समृद्धी केंद्र विकसित झाल्यानंतर म्हणजेच सुमारे पाच वर्षांनंतर या भूखंडाची रक्कम वाढणार आहे. याव्यतिरिक्त शेतकर्‍यांना १0 वर्षे पीक मोबदला म्हणून दरवर्षी १0 टक्के वाढीसह जिरायत जमिनीसाठी ५0 हजार रुपये, तर बागायती जमिनीसाठी एक लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला दिला जाणार आहे. एकंदरीत विचारकरिता भूसंचयन पद्धती शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. शेतकर्‍यांना भूसंपादनाचा पर्यायही खुला असणार आहे; मात्र यामध्ये शेतकर्‍यांना एक रकमी प्रति हेक्टरी जास्तीत जास्त सुमारे २५ लाख रुपये मोबदला मिळू शकतो. वाशिम जिल्ह्यातील सुमारे ११५२ हेक्टर जमिनीचे महामार्गासाठी भूसंचयन करण्यात येणार आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील ४२७.८२ हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यातील २१६.१८ हेक्टर, मालेगाव तालुक्यातील ४८२.७२ हेक्टर व रिसोड तालुक्यातील ५२.७९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे, तसेच वाशिम जिल्ह्यात मालेगाव, वनोजा व कारंजा येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता मालेगाव येथील सुमारे ९३७ हेक्टर, वनोजा येथील सुमारे ६00 हेक्टर व कारंजा सुमारे ६७0 हेक्टर जमीन भूसंचयन केली जाणार आहे. यामध्ये कारंजा येथील ६७0 हेक्टर जमिनीपैकी ११५ हेक्टर जमीन वन विभागाच्या मालकीची आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कारंजा तालुक्यातील २0, मंगरुळपीर तालुक्यातील ११, मालेगाव तालुक्यातील २0 व रिसोड तालुक्यातील एका गावामधून हा महामार्ग जाणार आहे. शेतकर्‍यांसाठी भूसंचयन पद्धती फायदेशीर ठरणार असल्याचे राहुल द्विवेदी म्हणाले.