शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अनुदानित तीन शाळा व मुख्याध्याकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:13 IST

तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देशाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यभरामध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील एकूण १२ शाळांध्ये कमी उपस्थिती आढळून आली होती.  तसेच काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटावर दाखविल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी शाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश प्राप्त होताच, प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी कार्यवाहीला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात योग्य ती चौकशी करून तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.राज्यामध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५0 टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळून आली होती तसेच अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती.  तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला. पटपडताळणी मोहिमेत २० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्द का करू नये, अशा नोटीस शाळांना बजावण्यात आल्या होत्या. ५० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शिक्षण संस्था व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता काढून घेण्याचा आदेश शासनाने २ मे २0१२ रोजी दिला होता. परंतु राज्यातील काही शिक्षण संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु, प्राथमिक शिक्षण संचालकांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले. उच्च न्यायालयाने संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचे शासनाचे अधिकार आहेत. परंतु, केवळ ५० टक्केपेक्षा विद्यार्थी उपस्थिती कमी आहे, या कारणावरून गुन्हा दाखल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने शाळांबाबत काही बाबी निदर्शनास आल्याने, आदेशाची पूर्तता करण्यास बजावले. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे. फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करावयाचा असल्याने, तो शिक्षण संचालनालयास सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या १० शाळांपैकी तीन शाळा अनुदानित असल्याने पहिल्या टप्प्यात या तीन शाळांप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्यात यावी, अशा सूचना गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या. त्यानंतर विनाअनुदानित ७ शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मानकर यांनी सांगितले.