शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित तीन शाळा व मुख्याध्याकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:13 IST

तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देशाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यभरामध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील एकूण १२ शाळांध्ये कमी उपस्थिती आढळून आली होती.  तसेच काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटावर दाखविल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी शाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश प्राप्त होताच, प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी कार्यवाहीला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात योग्य ती चौकशी करून तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.राज्यामध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५0 टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळून आली होती तसेच अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती.  तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला. पटपडताळणी मोहिमेत २० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्द का करू नये, अशा नोटीस शाळांना बजावण्यात आल्या होत्या. ५० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शिक्षण संस्था व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता काढून घेण्याचा आदेश शासनाने २ मे २0१२ रोजी दिला होता. परंतु राज्यातील काही शिक्षण संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु, प्राथमिक शिक्षण संचालकांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले. उच्च न्यायालयाने संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचे शासनाचे अधिकार आहेत. परंतु, केवळ ५० टक्केपेक्षा विद्यार्थी उपस्थिती कमी आहे, या कारणावरून गुन्हा दाखल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने शाळांबाबत काही बाबी निदर्शनास आल्याने, आदेशाची पूर्तता करण्यास बजावले. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे. फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करावयाचा असल्याने, तो शिक्षण संचालनालयास सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या १० शाळांपैकी तीन शाळा अनुदानित असल्याने पहिल्या टप्प्यात या तीन शाळांप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्यात यावी, अशा सूचना गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या. त्यानंतर विनाअनुदानित ७ शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मानकर यांनी सांगितले.