शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; कामकाजाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 18:09 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १० मेपासून असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १० मेपासून असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात १०० टक्के ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सहभागी असल्याने कामकाजाचा खोळंबा निर्माण झाला. ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या असून, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत केली नाही तसेच परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्याही ग्रामसेवकांना मिळाल्या नाहीत आदी आरोप करीत न्यायोचित मागणीसाठी ग्रामसेवकांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरूद्ध एल्गार पुकारला आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली तसेच चर्चाही केली. प्रलंबित मागण्यांसंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्याने १० मे पासून ग्रामसेवकांनी बेमुदत असहकार आंदोलन पुकारले आहे. कोणत्याही सभेला न जाणे, वरिष्ठांना कोणतेही अहवाल न देणे, ग्राम पंचायत तपासणीकरीता दप्तर न दाखविणे असे या आंदोलनाचे स्वरुप असून, यामध्ये सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या आश्वासित प्रगत योजनेची पुर्तता करण्यात आली नाही. कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत करण्यात आली नाही. परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्या ग्रामसेवकांना मिळाल्या नाहीत, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आले नाहीत, ग्रामसेवक संवर्गाच्या वैद्यकीय देयकांची परिपूर्तता करण्यात आली नाही, कालावधी पूर्ण केलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांना कायम करण्यात आले नाही, अनेक ग्रामसेवकांवर अन्यायकारक कारवाई करून मूळ वेतनावर आणल्याने सदरची कारवाई मागे घेण्यात यावी, काही तालुक्यातील ग्रामसेवकांनी दप्तर तपासणीस उपलब्ध करून न दिल्याबाबत योग्य ग्रामसेवकांचा शोध न घेता अन्य ग्रामसेवकांच्या वेतनातून २५ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली असून सदर रक्कम परत करण्यात यावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण करण्यात यावे, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना त्वरीत सेवेत घेण्यात यावे, राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी नाव पाठविण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारल्याने प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दप्तर तपासणीकरीता गेलेल्या पथकाला या असहकार आंदोलनामुळे खाली हात परतावे लागले. सध्या भीषण पाणीटंचाई व चारा टंचाई असून, काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे गावपातळीवरील ग्रामसेवकांचा अहवाल यापुढे वरिष्ठांना प्राप्त होणार नसल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्या जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन झाले तर निलंबन, वेतनवाढ राखणे यासह गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाते. मात्र वरिष्ठ अधिकाºयांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन झाले तर कोणतीही कारवाई होत नाही. हा एकप्रकारे कनिष्ठ कर्मचाºयांवर अन्याय असून, शासकीय नियमाचे उल्लंघन करणाºया वरिष्ठ अधिकाºयांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी संघटनेची भूमिका आहे. या न्यायोचित मागणीसाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातही दाद मागण्याच्या निर्णयापर्यंत संघटना आली आहे.- आत्माराम नवघरे, जिल्हाध्यक्षमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, जिल्हा शाखा वाशिम.----प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात चर्चा झाली. मात्र, ठोस तोडगा निघाला नाही. प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.-अरूण इंगळेजिल्हा सचिवमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, जिल्हा शाखा वाशिम.