शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

२९ उमेदवारांचे नामांकन वैध

By admin | Updated: July 26, 2014 22:07 IST

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक

वाशीम : जिल्हा विकासाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या निवडून द्यावयाच्या २१ सदस्यपदासाठी २९ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सदस्यत्वासाठी चुरस असल्याचे जवळपास निश्‍चीत आहे. अर्थात दाखल वा अपात्र अर्जासंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल करावयाचा कालावधी व त्यांनी घ्यावयाच्या निर्णयानंतर म्हणजे ४ ऑगस्टनंतर यासंबंधी अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य निवडून देणे अपेक्षीत आहे. या २0 सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधील २, अनुसूचित जाती स्त्री २, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री १ , नागरिकांचा मागास प्रवर्गातून ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा सदस्यांचा समावेश आहे. सदस्यत्वासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या २३ जुलैपर्यंतच्या मुदतीपर्यंत नागरी क्षेत्रातून एका जागेसाठी ५ तर ग्रामीणमधून २0 जागांसाठी तब्बल ३७ अर्ज सादर करण्यात आले होते. नामनिर्देशनपत्र छाननीनंतर नागरी भागातील १ तर ग्रामीण भागातील ५ अर्ज अवैध ठरले. नागरी भागातील उर्वरित चारही इच्छुकांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती असून, ग्रामीण भागातील जे ३७ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याने वैध अर्जापैकी २५ जणांचे प्रत्येकी एक असे २७ अर्ज नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरल्याची माहिती आहे. फेटाळल्या गेलेल्या अर्जकर्त्यांना २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील करण्याचा अवधी असून, अपिलानंतर वैध नामनिर्देशनपत्राची अंतिम यादी ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार असून ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. तोवरी अपेक्षीत संख्येपेक्षा अधिक इच्छुक राहिल्यास आवश्यकता पडल्यास २६ जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व २७ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी होऊन मतदानाचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली.