शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

ना स्वतंत्र शौचालय, ना स्वच्छतागृह; तरीही गृहविलगीकरणाला परवानगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे; तर दुसरीकडे ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. यामुळे कोरोनाबाधितापासून कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यात आतापर्यंत शहरी भागात ५८०७ तर ग्रामीण भागात ७४७६ रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील रुग्णाच्या घरी स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था नसतानादेखील गृहविलगीकरणाला परवानगी दिली जात आहे. यामुळे घरातील एकाच स्वच्छतागृह, शौचालयाचा वापर हा रुग्ण व कुटुंबातील इतर सदस्यांकडून केला जातो. परिणामी, कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. गोवर्धन, शिरपूर, अनसिंग, धमधमी, शेलुबाजार, खैरखेडा या गावात एकाच कुटुंबातील अधिकाधिक सदस्यांना संसर्ग झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध असतानाही गृहविलगीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या ३७५६ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी केवळ ४७२ रुग्ण खासगी कोविड तसेच सरकारी कोविड केअर सेंटर, रुग्णालयात भरती आहेत तर उर्वरीत तब्बल ३२८४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यास गृहविलगीकरणाला परवानगी देऊ नये, असा सूर वैद्यकीय क्षेत्रासह ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

0000000000

एकूण सक्रिय रुग्ण - ३७५६

गृहविलगीकरणातील रुग्ण - ३२८४

रुग्णालयात दाखल रूग्ण - ४७२

000000

खाटाचा प्रकार भरती रुग्णरिक्त बेड

सर्वसाधारण १९० ८७२

आॅक्सिजन २५३ २२१

आयसीयू २९ ४४

००००००

बॉक्स..

.. तर यापुढे गृहविलगीकरण पूर्णत: बंद !

१) जिल्ह्यात ग्रामीण भगाात रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. यापुढे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार असून, असा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २२ मे रोजी काढला. काही निवडक परिस्थिती वगळता यापुढेही गृहविलगीकरण पूर्णत: बंद करण्यात यावे. यासाठी प्रत्येक गावात संस्थात्मक विलगीकरणासाठी इमारती शोधण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

२) संबंधित इमारतीमध्ये पिण्याचे व वापरण्याचे पाणी,. पंखा, विद्युत दिव्याची व्यवस्था, शौचालय यापैकी काही व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतीकडील १५ व्या वित्त आयोगातून दुरुस्तीची कामे घेऊन प्रत्येक गावात अशा इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी सज्ज ठेवाव्यात. अशा संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णास त्यांचे घरुन जेवणाचा डब्बा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मुभा देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या.

यापूढे गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यास, लक्षणे नसलेले रुग्ण या इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात येतील. जे रुग्ण या संस्थात्मक विलगीकरणाच्या अटी व शतीर्चे पालन करणार नाहीत अशा सर्व रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणावरील कोविड केअर सेंटर येथे तातडीने हलविण्यात यावे. आवश्यकता पडल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.