शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आता कोणीच नाही राहणार उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

वाशिम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थींना ८ रुपये प्रतिकिलो ...

वाशिम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थींना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून, जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील २७ हजार ७३६ लाभार्थींना सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे. रास्त भाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम (फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड) या तत्त्वानुसार धान्य वितरण करावे. लाभार्थींना याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले. शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करताना रास्त भाव दुकानदारांनी त्या शिधापत्रिकेचा क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील संपूर्ण तपशील, याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी, अशा सूचनाही पुरवठा विभागाने दिल्या.

00०००००

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक २७८१५०

प्राधान्य - १८११०९

अंत्योदय - ४८९७०

केशरी - २७७३६

००००००

अंत्योदयच्या

४८९७०

कुटुंबांना लाभ

१) कडक निर्बंधांच्या काळात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, शेतकरी गटातील लाभार्थींना एका महिन्यासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अंत्योदयच्या ४८९७० लाभार्थींसह प्राधान्य कुटुंब व शेतकरी गटातील लाभार्थींनादेखील मोफत अन्नधान्य मिळत आहे.

२) केंद्र सरकारनेदेखील दोन महिन्यांसाठी अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व शेतकरी गटातील लाभार्थींना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक रेशन दुकानांमधून मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे.

३) आता केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे.

०००००००००००००००

१ किलो गहू

१ किलो तांदूळ

००००

‘केशरी’च्या २७७३६ कुटुंबांना मिळणार धान्य

केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात रेशनचे गहू व तांदूळ हे धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या २७ हजार ७३६ आहे. कुटुंबातील प्रतिव्यक्ती एक किलो याप्रमाणे गहू व तांदूळ मिळणार आहेत. कुटुंबात चार सदस्य असतील तर चार किलो धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. गव्हाचे दर प्रतिकिलो ८ रुपये व तांदळाचे दर प्रतिकिलो १२ रुपये असे आहेत.

००००००००००००

कोट बॉक्स

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशनच्या गहू आणि तांदळाचे वितरण १ जूनपासून करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ हजार ७३६ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. पुरवठा विभागातर्फे पूर्वतयारी झाली आहे.

- सुनील विंचनकर

जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम