शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:53 IST

हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही.

ठळक मुद्दे हवामानाचा अंदाज घेणाºया स्कायमॅट कंपनीच्या माध्यमातून ही हवामान केंदे्र स्थापित करण्यात आली आहेत. दर दहा मिनिटाला या हवामान केंद्रात संकलित होणारी माहिती स्कायमॅटच्यावतीने राज्य शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात येते. अमरावती विभागात अद्याप कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणाच विकसित केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज कळावा आणि त्यानुसार नियोजन करता यावे म्हणून शासनाच्यावतीने महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली. या हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमापासून वंचितच आहेत.हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकºयांचे नियोजन चुकते. दुबार पेरणीसह इतरही संकटाला शेतकºयांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी महावेध प्रकल्पांतर्गत सर्व महसूल मंडळात दोन हजार स्वयंचलित हवामान केंदे्र स्थापितही करण्यात आली. या हवामान केंद्रांमुळे ‘डिजिटल किआॅक्स’च्या माध्यमातून १२ बाय १२ किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटाला उपलब्ध होते. शेतकºयांना ‘एसएमएस’च्या माध्यमातून ती पाठविण्याचे ठरले होते. हवामानाचा अंदाज घेणाºया स्कायमॅट कंपनीच्या माध्यमातून ही हवामान केंदे्र स्थापित करण्यात आली आहेत. या हवामान केंद्रांद्वारे गावात किती पाऊस पडणार, कसा पडणार, केव्हा पडणार, तसेच कोणते पीक घेता येईल, सापेक्ष आर्द्रता, वाºयाचा वेग आणि दिशा यासह हवामानविषयक बदलाची सर्व माहिती शेतकºयांना प्राप्त होणे अपेक्षित आहे. दर दहा मिनिटाला या हवामान केंद्रात संकलित होणारी माहिती स्कायमॅटच्यावतीने राज्य शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात येते आणि ती प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यातही येत आहे; परंतु अमरावती विभागात अद्याप कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणाच विकसित केलेली नाही, त्यामुळे शासनाचा उद्देश असफल ठरला आहे.हवामान केंद्रांत संकलित होणारी माहिती शेतकºयांपर्यंत नेमकी कशी पोहोचवायची, याबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. कृषी सहसंचालकांकडे यासंदर्भात मार्गदर्शन मागण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेतकºयांना हवामानाची माहिती पुरविण्यात येईल.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमweatherहवामानFarmerशेतकरी