शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:53 IST

हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही.

ठळक मुद्दे हवामानाचा अंदाज घेणाºया स्कायमॅट कंपनीच्या माध्यमातून ही हवामान केंदे्र स्थापित करण्यात आली आहेत. दर दहा मिनिटाला या हवामान केंद्रात संकलित होणारी माहिती स्कायमॅटच्यावतीने राज्य शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात येते. अमरावती विभागात अद्याप कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणाच विकसित केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज कळावा आणि त्यानुसार नियोजन करता यावे म्हणून शासनाच्यावतीने महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली. या हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमापासून वंचितच आहेत.हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकºयांचे नियोजन चुकते. दुबार पेरणीसह इतरही संकटाला शेतकºयांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी महावेध प्रकल्पांतर्गत सर्व महसूल मंडळात दोन हजार स्वयंचलित हवामान केंदे्र स्थापितही करण्यात आली. या हवामान केंद्रांमुळे ‘डिजिटल किआॅक्स’च्या माध्यमातून १२ बाय १२ किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटाला उपलब्ध होते. शेतकºयांना ‘एसएमएस’च्या माध्यमातून ती पाठविण्याचे ठरले होते. हवामानाचा अंदाज घेणाºया स्कायमॅट कंपनीच्या माध्यमातून ही हवामान केंदे्र स्थापित करण्यात आली आहेत. या हवामान केंद्रांद्वारे गावात किती पाऊस पडणार, कसा पडणार, केव्हा पडणार, तसेच कोणते पीक घेता येईल, सापेक्ष आर्द्रता, वाºयाचा वेग आणि दिशा यासह हवामानविषयक बदलाची सर्व माहिती शेतकºयांना प्राप्त होणे अपेक्षित आहे. दर दहा मिनिटाला या हवामान केंद्रात संकलित होणारी माहिती स्कायमॅटच्यावतीने राज्य शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात येते आणि ती प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यातही येत आहे; परंतु अमरावती विभागात अद्याप कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणाच विकसित केलेली नाही, त्यामुळे शासनाचा उद्देश असफल ठरला आहे.हवामान केंद्रांत संकलित होणारी माहिती शेतकºयांपर्यंत नेमकी कशी पोहोचवायची, याबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. कृषी सहसंचालकांकडे यासंदर्भात मार्गदर्शन मागण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेतकºयांना हवामानाची माहिती पुरविण्यात येईल.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमweatherहवामानFarmerशेतकरी