शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पार्डी ताड ग्रामपंचायतच्या चौकशीनंतर कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:08 IST

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे नियमित ग्रामसभा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडून गटविकास अधिकाºयांकडे करण्यात येत होत्या. या संदर्भात लोकमतने ६ सप्टेंबर रोजी पार्डी ताड येथे वर्षभरापासून ग्रामसभाच नाही. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. पार्डी येथील ग्रामपंचायतच्या सचिवांनी आॅगस्ट २०१७ मध्ये प्रभार घेतल्यापासून ग्रामसभेचे आयोजन केले नाही, तसेच ते गावात नियमित येत नाहीत. मासिकसभेलाही उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका वर्षात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि गांधी जयंतीला ग्रामसभेचे आयोजन आवश्यक असताना वर्षभरात एकही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळेच गावात तंटामूक्ती अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही, अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून पंचायत समितीचे लक्ष वेधल्यानंतर गटविकास अधिकाºयांनी विस्तार अधिकारी पद्मने यांच्यामार्फत २५ सप्टेंबर रोजी या प्रकाराची चौकशी केली. यावेळी विस्तार अधिकाºयांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव, तसेच पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे, प्रकाश डाळ, बाळू लांभाडे, गणेश जटाळे, दिनकर डाळ, परशराम लांभाडे या ग्रामस्थांचे बयाण नोंदविले. या चौकशीला २ महिने उलटले तरी, कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पंचायत समितीने चौकशीचा केवळ दिखावाच केला काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बयाणात आढळला होता विरोधाभास पार्डी ताड येथील ग्रामसभेबाबत केलेल्या चौकशीदरम्यान ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांसह ग्रामस्थांच्या बयाणात विस्तार अधिकाºयांना विरोधाभासही आढळून आला होता. सचिवांनी १५ आॅगस्ट रोजी त्यांच्याकडे चांभईचा प्रभार असल्याने पार्डी ताड येथे सभा घेतली नसल्याचे; परंतु २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा घेतल्याचे नमूद केले, तर सरपंचांनीही २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे नमूद केले; परंतु पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे या तिन्ही ग्रामस्थांनी २३ आॅगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याचे बयाणात सांगतानाच हजेरी पुस्तकातील स्वाक्षरी आपली नसल्याचेही दोघांनी म्हटले होते.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत