शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

निजामपूर स्मशानभूमीचे लोकसहभागातून होणार सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम ...

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अजित शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दुर्लक्षित स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक सरसावले आहेत. या कामाकरिता लोकसहभागातून २५ लाख रुपयांची वर्गणी जमा करणार असल्याची माहिती निजामपूर स्मशानभूमी सुशोभिकरण समितीचे सदस्य तथा सरपंच डिगांबर जाधव यांनी दिली.

स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामामध्ये तारेचे कंपाऊंड करणे, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण, नागरिकांना बसण्याकरिता आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी अत्यावश्यक सुविधांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी निजामपूर आणि रिसोड शहरातील नागरिक लोकसहभागातून गोळा करत आहेत. आजपर्यंत १५ लाख रुपयांची वर्गणी जमा झाली आहे. या कामावर देखरेखीकरिता १० सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून, या समितीकडे सुशोभिकरणाच्या कामाचा लेखाजोखा राहणार आहे.

या कार्यक्रमाला रामकिसन दवंड, बबनराव मोरे, दीपक सोनुने, बबन सुरूशे, विनोद परबत, कपिल पाटील कदम, नारायण गायकवाड, पवन छित्तरका, सुभाष चोपडे, सदाशिव चौधरी, प्रल्हाद गायकवाड, सोनाजी करे, हरिभाऊ दवड, गोपाल जाधव, विठ्ठल दरुगे, प्रल्हाद दवंड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अर्जुन वरघट यांनी केले.