शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

निजामपूर स्मशानभूमीचे लोकसहभागातून होणार सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम ...

रिसोड : तालुक्यातील निजामपूर येथील स्मशानभूमीचे लोकसहभागातून सुशोभिकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अजित शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दुर्लक्षित स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी निजामपूर व रिसोड शहरातील नागरिक सरसावले आहेत. या कामाकरिता लोकसहभागातून २५ लाख रुपयांची वर्गणी जमा करणार असल्याची माहिती निजामपूर स्मशानभूमी सुशोभिकरण समितीचे सदस्य तथा सरपंच डिगांबर जाधव यांनी दिली.

स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामामध्ये तारेचे कंपाऊंड करणे, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण, नागरिकांना बसण्याकरिता आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी अत्यावश्यक सुविधांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी निजामपूर आणि रिसोड शहरातील नागरिक लोकसहभागातून गोळा करत आहेत. आजपर्यंत १५ लाख रुपयांची वर्गणी जमा झाली आहे. या कामावर देखरेखीकरिता १० सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून, या समितीकडे सुशोभिकरणाच्या कामाचा लेखाजोखा राहणार आहे.

या कार्यक्रमाला रामकिसन दवंड, बबनराव मोरे, दीपक सोनुने, बबन सुरूशे, विनोद परबत, कपिल पाटील कदम, नारायण गायकवाड, पवन छित्तरका, सुभाष चोपडे, सदाशिव चौधरी, प्रल्हाद गायकवाड, सोनाजी करे, हरिभाऊ दवड, गोपाल जाधव, विठ्ठल दरुगे, प्रल्हाद दवंड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अर्जुन वरघट यांनी केले.