शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

निसर्ग पर्यटन केंद्रातील आगीची घटना दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:56 IST

संत सेवालाल महाराज यांच्या नावाने वनविभागाने तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पोहरादेवी-वाईगौळ या रस्त्याच्या दुतर्फा निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती मागील काही ...

संत सेवालाल महाराज यांच्या नावाने वनविभागाने तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पोहरादेवी-वाईगौळ या रस्त्याच्या दुतर्फा निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती मागील काही वर्षांपूर्वी केलेली आहे. निसर्गाचा समतोल टिकून राहावा, यासाठी या पर्यटन केंद्रामध्ये बहुमूल्य अशा वनसंपदेची लागवड २०१६-१७ या वर्षांत करण्यात आली. या पर्यटन केंद्राला चोहोबाजूंनी संरक्षण भिंतही उभारण्यात आलेली आहे. तसेच लक्ष ठेवण्याकरिता वन कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. सर्व बाजूने तार कुंपण व कर्मचाऱ्यांचा ताफा रात्रंदिवस गस्तीवर असतो. असे असताना आगीची घटना घडून वृक्षसंपदा नष्ट झालेली आहे.

वन पर्यटन केंद्राच्या शेजारी असलेल्या वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील वीज वितरिका वनपर्यटन केंद्रांमधून गेलेली आहे. या विजेच्या तारांमधील शॉर्टसर्किटने वनपर्यटन केंद्रामध्ये आग लागल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीला यापूर्वी वीज वितरिकांबाबत उपाययोजना करण्यासाठी भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ७२ नुसार नोटीस बजावण्यात आली. त्याऊपरही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळेच आगीची घटना घडल्याने नियमानुसार गुन्हेदेखील दाखल करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी दिली.