शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राष्ट्रीयीकृत बँकांचा अग्रीम कर्जास नकार!

By admin | Updated: June 24, 2017 05:32 IST

शासनाचे आदेशही धुडकावले; आरबीआयचे निर्देश नसल्याची स्पष्टोक्ती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपये अग्रीम कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली असली तरी जिल्हय़ातील एकाही राष्ट्रीयीकृत बँकेत अशाप्रकारचे कर्ज देणे अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, ह्यआरबीआयह्ण आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयाकडून यासंदर्भात ठोस निर्देश प्राप्त होईपर्यंंंंत प्रक्रिया राबविता येणार नाही, असे सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले.शासनाने २0 जून रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंंंंत जिल्हा मध्यवर्तीसह इतर सर्व प्रकारच्या बँकांनी शेतकर्‍यांना खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खत यासह इतर साहित्य खरेदीसाठी १0 हजार रुपये अग्रीम कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक स्तरावरूनही शासन अध्यादेशाच्या प्रतींसह दोन ते तीन वेळा बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या १0 हजार रुपये अग्रीम कर्जासंबंधी कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयांकडून जिल्हास्तरावरील शाखांना स्पष्ट सूचना नसल्याने तातडीच्या कर्जवाटपाची प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन-प्रशासनासोबतच बँकांनीही शेतकर्‍यांना आणले मेटाकुटीसथकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी तातडीने १0 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, २३ जूनपर्यंंंंत एकाही राष्ट्रीयीकृत बँकेनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला तरी कर्जवाटप प्रक्रियेस मंगळवारनंतरच प्रारंभ होणार आहे. ३0 जून २0१६ पर्यंंंंतच्या थकबाकीदार शेतकर्‍यांनी १0 हजार रुपये कर्ज मिळण्यासंदर्भात बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे; परंतु बँकेत जाणार्‍या शेतकर्‍यांना खाली हात परत पाठविले जात आहे.२0 जून २0१७ च्या शुद्धीपत्रकानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्ती १0 हजार रुपये कर्ज घेण्यास अपात्र ठरविण्यात आल्या आहेत; मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या सर्व शेतकरी खातेदारांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना आणि शासन अध्यादेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपासंदर्भात उदासीनता दर्शविल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून १0 हजार रुपये अग्रीम कर्जवाटपाचे निर्देश मिळालेले नाहीत. मंगळवारपर्यंंंंत यासंदर्भातील ह्यसकरुलरह्ण येण्याची शक्यता असून, त्यानंतरच खातेदार शेतकर्‍यांना अग्रीम कर्ज दिले जाईल. - विजय नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिमराष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंंंंत अग्रीम कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करायला हवी होती. यासंदर्भात अध्यादेशाच्या प्रतींसह बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मंगळवारी वरिष्ठांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा चर्चिल्या जाईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम