शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राष्ट्रीयीकृत बँकांचा अग्रीम कर्जास नकार!

By admin | Updated: June 24, 2017 05:32 IST

शासनाचे आदेशही धुडकावले; आरबीआयचे निर्देश नसल्याची स्पष्टोक्ती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपये अग्रीम कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली असली तरी जिल्हय़ातील एकाही राष्ट्रीयीकृत बँकेत अशाप्रकारचे कर्ज देणे अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, ह्यआरबीआयह्ण आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयाकडून यासंदर्भात ठोस निर्देश प्राप्त होईपर्यंंंंत प्रक्रिया राबविता येणार नाही, असे सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले.शासनाने २0 जून रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंंंंत जिल्हा मध्यवर्तीसह इतर सर्व प्रकारच्या बँकांनी शेतकर्‍यांना खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खत यासह इतर साहित्य खरेदीसाठी १0 हजार रुपये अग्रीम कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक स्तरावरूनही शासन अध्यादेशाच्या प्रतींसह दोन ते तीन वेळा बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या १0 हजार रुपये अग्रीम कर्जासंबंधी कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयांकडून जिल्हास्तरावरील शाखांना स्पष्ट सूचना नसल्याने तातडीच्या कर्जवाटपाची प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन-प्रशासनासोबतच बँकांनीही शेतकर्‍यांना आणले मेटाकुटीसथकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी तातडीने १0 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, २३ जूनपर्यंंंंत एकाही राष्ट्रीयीकृत बँकेनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला तरी कर्जवाटप प्रक्रियेस मंगळवारनंतरच प्रारंभ होणार आहे. ३0 जून २0१६ पर्यंंंंतच्या थकबाकीदार शेतकर्‍यांनी १0 हजार रुपये कर्ज मिळण्यासंदर्भात बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे; परंतु बँकेत जाणार्‍या शेतकर्‍यांना खाली हात परत पाठविले जात आहे.२0 जून २0१७ च्या शुद्धीपत्रकानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्ती १0 हजार रुपये कर्ज घेण्यास अपात्र ठरविण्यात आल्या आहेत; मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या सर्व शेतकरी खातेदारांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना आणि शासन अध्यादेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपासंदर्भात उदासीनता दर्शविल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून १0 हजार रुपये अग्रीम कर्जवाटपाचे निर्देश मिळालेले नाहीत. मंगळवारपर्यंंंंत यासंदर्भातील ह्यसकरुलरह्ण येण्याची शक्यता असून, त्यानंतरच खातेदार शेतकर्‍यांना अग्रीम कर्ज दिले जाईल. - विजय नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिमराष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंंंंत अग्रीम कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करायला हवी होती. यासंदर्भात अध्यादेशाच्या प्रतींसह बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मंगळवारी वरिष्ठांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा चर्चिल्या जाईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम