शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

राष्ट्रीयीकृत बँकांचा अग्रीम कर्जास नकार!

By admin | Updated: June 24, 2017 05:32 IST

शासनाचे आदेशही धुडकावले; आरबीआयचे निर्देश नसल्याची स्पष्टोक्ती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपये अग्रीम कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली असली तरी जिल्हय़ातील एकाही राष्ट्रीयीकृत बँकेत अशाप्रकारचे कर्ज देणे अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, ह्यआरबीआयह्ण आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयाकडून यासंदर्भात ठोस निर्देश प्राप्त होईपर्यंंंंत प्रक्रिया राबविता येणार नाही, असे सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले.शासनाने २0 जून रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंंंंत जिल्हा मध्यवर्तीसह इतर सर्व प्रकारच्या बँकांनी शेतकर्‍यांना खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खत यासह इतर साहित्य खरेदीसाठी १0 हजार रुपये अग्रीम कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक स्तरावरूनही शासन अध्यादेशाच्या प्रतींसह दोन ते तीन वेळा बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या १0 हजार रुपये अग्रीम कर्जासंबंधी कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुख्यालयांकडून जिल्हास्तरावरील शाखांना स्पष्ट सूचना नसल्याने तातडीच्या कर्जवाटपाची प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन-प्रशासनासोबतच बँकांनीही शेतकर्‍यांना आणले मेटाकुटीसथकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी तातडीने १0 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, २३ जूनपर्यंंंंत एकाही राष्ट्रीयीकृत बँकेनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला तरी कर्जवाटप प्रक्रियेस मंगळवारनंतरच प्रारंभ होणार आहे. ३0 जून २0१६ पर्यंंंंतच्या थकबाकीदार शेतकर्‍यांनी १0 हजार रुपये कर्ज मिळण्यासंदर्भात बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे; परंतु बँकेत जाणार्‍या शेतकर्‍यांना खाली हात परत पाठविले जात आहे.२0 जून २0१७ च्या शुद्धीपत्रकानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्ती १0 हजार रुपये कर्ज घेण्यास अपात्र ठरविण्यात आल्या आहेत; मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या सर्व शेतकरी खातेदारांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना आणि शासन अध्यादेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपासंदर्भात उदासीनता दर्शविल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून १0 हजार रुपये अग्रीम कर्जवाटपाचे निर्देश मिळालेले नाहीत. मंगळवारपर्यंंंंत यासंदर्भातील ह्यसकरुलरह्ण येण्याची शक्यता असून, त्यानंतरच खातेदार शेतकर्‍यांना अग्रीम कर्ज दिले जाईल. - विजय नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिमराष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंंंंत अग्रीम कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करायला हवी होती. यासंदर्भात अध्यादेशाच्या प्रतींसह बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मंगळवारी वरिष्ठांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा चर्चिल्या जाईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम