शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘नरेगा’च्या कामांना जिल्ह्यात ‘खो’

By admin | Updated: April 10, 2015 02:11 IST

२0१२ पासून १0५ तक्रारी; वाशिम जिल्ह्यात जेसीबीने कामे होत असल्याचा आरोप.

वाशिम : राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत जिल्हय़ात सिंचन, पांदन रस्ते, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण, रस्ता खडीकरण, वृक्षलागवड, गोठा बांधकाम आदी कामे झाली आहेत; परंतु ही कामे दर्जाहीन आहे, यात भ्रष्टाचार झाला यासह सन २0१२ पासून आतापर्यंंत यासंदर्भात जिल्हय़ातून १0५ तक्रारी झाल्या आहेत. रोहयोची कामे जेसीबीने होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारींचा यात समावेश आहे. ग्रामीण विकासाला चालना मिळावी, या उदात्त हेतूने शासनाने सन २0१२ पासून राज्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. रोजगाराच्या शोधार्थ गावातील मजुरांचे स्थलांतरण रोखण्याकरिता शासनाने या योजनेंतर्गत मजुरांना ह्यजॉबकार्डह्ण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले. योजनेच्या माध्यमातून गावागावात सिंचनाची कामे, पांदन रस्त्यांची निर्मिती, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण करणे, ग्रामीण भागांना जोडल्या जाणार्‍या रस्त्यांचे खडीकरण करणे, पर्यावरण संतुलनाकरिता ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे आदी कामांची तरतूद शासनाने केली आहे. याकरिता शासनस्तराहून प्रत्येक तालुक्यासाठी भला मोठा निधीही देण्यात आला. मात्र, पंचायत समिती स्तरावरून या योजनेची चोख अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सन २0१२ पासून या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातून १७, रिसोड १५, मालेगाव १४, मंगरुळपीर २७, मानोरा २१ आणि कारंजा तालुक्यातून ११ अशा एकंदरीत १0५ तक्रारी झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शतकोटी वृक्षलागवड योजनेत झालेला भ्रष्टाचार, सिंचन विहिरीचा लाभार्थ्यांंना लाभ होत नसल्याचा मुद्दा, रोहयोची कामे जेसीबीने केली जात असल्याचा आरोप, रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे न मिळणे, वाईगौळ येथे सरपंच, ग्रामसेवक, प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे यांनी संगनमत करून ९७ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला, जॉबकार्ड वेळेवर न मिळणे आदी मुद्यासंदर्भातील तक्रारींसह इतर तक्रारींचा समावेश आहे.