शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीतील आर्द्रतेची अट शिथिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 19:40 IST

शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करणारमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे. पूर्वी १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच ‘फेअर  अँव्हरेज कॉलिटी’च्या कक्षेत ग्राह्य धरण्यात येत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी  मंगळवारी विविध विषयावर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये १४ टक्के  आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  याबाबत निर्णय झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार  आहे.  राज्यात यंदा अपुर्‍या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. शेतकरी  काढलेले सोयाबीन विकण्यासाठी बाजारात आणत असताना व्यापार्‍यांकडून  शासनाकडून निर्धारित ३0५0 पेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी सुरू  असल्याने लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांत रोषाचे वातावरण निर्माण झाले हो ते. त्यामुळे शासनाने नाफेडमार्फत राज्यात नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी  सुरू केली; परंतु या ठिकाणी ‘फेअर अँव्हरेज क्वॉलिटी’ अर्थात चांगल्या  दर्जाचा मालच मोजला जात असल्याने शेतकरी अडचणीत आले. नाफेडच्या  सोयाबीन खरेदीसाठी जास्तीत जास्त १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच  हमीभावाने खरेदी करण्यात येत असल्याने शेकडो शेतकर्‍यांना नोंदणी करून  आपला माल परत न्यावे लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घे तली. यामध्ये कृषी विभागाचे सचिव, महसूल आयुक्त, कृषी आयुक्त,  जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचा  समावेश होता. या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाफेडच्या  खरेदीचा आढावा घेतला आणि सोयाबीन खरेदी करताना आर्द्रतेची अट शि िथल करून १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के करण्याचे संकेत दिले. तथापि,  यासंदर्भात पणन महामंडळ प्रशासनाला लेखी आदेशच प्राप्त झाले नसल्याने  अद्यापही १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच नाफेडच्या केंद्रावर खरेदी  करण्यात येत आहे. 

शासनाकडून नाफेडच्या खरेदीसाठी १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के आद्र्र ता असलेले सोयाबीन मोजून घेण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे; परंतु  अद्याप आम्हाला यासंदर्भात लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आम्ही  १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच खरेदी करीत आहोत. लेखी आदेश  प्राप्त होताच १४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी करण्यात येईल.-गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी  अकोला-वाशिम.

टॅग्स :Marketबाजारagricultureशेती