शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोटाबंदीचा रब्बी पीककर्ज वाटपाला फटका

By admin | Updated: January 6, 2017 19:15 IST

नोटांबदीमुळे रब्बी पीककर्ज वाटप प्रक्रियेला जबर फटका बसला असून, ५ जानेवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यात केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप झाले.

 ऑनलाइन लोकमत
संतोष वानखडे /ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ६ - नोटांबदीमुळे रब्बी पीककर्ज वाटप प्रक्रियेला जबर फटका बसला असून,  ५ जानेवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यात केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप झाले. ३६ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट असून, केवळ १० कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले.
८ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँक, अर्बन बँकाच्या खरिप पीककर्ज वसुलीला जबर फटका बसला. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप प्रक्रियाही ठप्प झाली. विविध प्रकारच्या बँकांनी एकूण ३६ कोटी रुपयांचे रब्बी पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले होते. यापैकी केवळ १० कोटी कर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी २८ अशी येते. सर्वाधिक फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाला बसला. आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप मध्यवर्ती बँकेने केलेले होते. यावर्षी ऐन रब्बी हंगामात नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याने आणि मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध लादल्याने केवळ ३० सभासद शेतकऱ्यांना २४ लाखाचे पीककर्ज वाटप करण्यात आले. १७.२० कोटींचे रब्बी पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला होते.