शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू ...

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू करावी, असा सूर प्राचार्यांसह विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

कोरोनामुळे गतवर्षातील मार्च महिन्यापासून शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. यंदाही २६ जूनपासून प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळा सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये का नाही? असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

००००००००००००

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये २७

०००००००

एकूण विद्यार्थीसंख्या २२३८०

००००००००

शाखानिहाय विद्यार्थीसंख्या

विज्ञान ८७०४

वाणिज्य १७९०

कला ११८८६

००००००००००००

प्राचार्यांची तयारी

कोट

कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. याच धर्तीवर वरिष्ठ स्तरावर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात. महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली तर निश्चितच प्रभावी नियोजन केले जाईल.

- डॉ. मीलनकुमार संचेती, प्राचार्य

००००००००

कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने महाविद्यालयेदेखील सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे खबरदारी घेऊ शकतात. महाविद्यालय प्रशासनदेखील योग्य ती खबरदारी घेते. परवानगी मिळाली तर संपूर्ण तयारी केली जाईल.

- जी. एस. कुबडे, प्राचार्य

०००००००

महाविद्यालये सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

कोट

आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालयेदेखील सुरू करायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- गौरव गायकवाड, विद्यार्थी

०००००००००००

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण मिळणे आवश्यक ठरत आहे.

- हर्षल गव्हांदे, विद्यार्थी