शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू ...

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू करावी, असा सूर प्राचार्यांसह विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

कोरोनामुळे गतवर्षातील मार्च महिन्यापासून शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. यंदाही २६ जूनपासून प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळा सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये का नाही? असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

००००००००००००

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये २७

०००००००

एकूण विद्यार्थीसंख्या २२३८०

००००००००

शाखानिहाय विद्यार्थीसंख्या

विज्ञान ८७०४

वाणिज्य १७९०

कला ११८८६

००००००००००००

प्राचार्यांची तयारी

कोट

कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. याच धर्तीवर वरिष्ठ स्तरावर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात. महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली तर निश्चितच प्रभावी नियोजन केले जाईल.

- डॉ. मीलनकुमार संचेती, प्राचार्य

००००००००

कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने महाविद्यालयेदेखील सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे खबरदारी घेऊ शकतात. महाविद्यालय प्रशासनदेखील योग्य ती खबरदारी घेते. परवानगी मिळाली तर संपूर्ण तयारी केली जाईल.

- जी. एस. कुबडे, प्राचार्य

०००००००

महाविद्यालये सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

कोट

आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालयेदेखील सुरू करायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- गौरव गायकवाड, विद्यार्थी

०००००००००००

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण मिळणे आवश्यक ठरत आहे.

- हर्षल गव्हांदे, विद्यार्थी