शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतक-यांचे दिवाळीच्या दिवशी आंदोलन

By admin | Updated: October 25, 2014 00:17 IST

‘चटणी-भाकर’ खावून अभिनव आंदोलनाने वेधले लक्ष, वाशिम जिल्हाधिका-यांना दिले निवेदन.

वाशिम :गोवर्धन येथील गजानन भिकाराव वाघांसह इतर शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी दीपावलीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खावून आंदोलन केले.या आंदोलनामागे केवळ वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर आजघडीला ओढावलेल्या विविध संकटांसह जगणे मुश्कील झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाला जागे करण्याचीच भूमिका होती. या आंदोलनादम्यान वाशिम जिल्ह्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकर्‍यांकडील थकीत कर्ज तत्काळ माफ करुन त्याना नव्याने बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, चालू खरीप हंगामात सर्व शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी किमान दहा तास अखंडित वीज पुरवठा द्यावा, शेतकर्‍यांना शेतीकर्ज काढणीसाठी लागणारा कर्ज नसल्याचा दाखला विनामूल्य देण्यात यावा, आदी प्रमुख मागण्या शेतकर्‍यांनी केल्या. या आंदोलनात गजानन वाघ यांच्यासह प्रल्हाद कानडे, मनोहर भवर, सुभाष ढोकणे, अकाश वाघ, संतोष नवले, मोतीराम वर्‍हाडे, विश्‍वनाथ ढोकणे, हिम्मतराव वाघ, पांडुरंग वाघ, प्रल्हाद अंभोरे, निलेश ढोकणे, विक्रमा जाधव, महादेव ठाकरे, दिनकर वाघ, पंकज वाघ, संदेश वाघ, गजानन कु. वाघ आदी सहभागी झाले होते. गतवर्षी अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्‍यांची उभी पिके नेस्तनाबूत केली. खरीप व रब्बी हंगामानंतर निदान यावेळच्या खरीप हंगामात तरी निसर्गाची कृपा होईल, असे वाटत होते; परंतु यावर्षीचा खरीप हंगाम व नगदी असलेले सोयाबीनचे पीक अल्प पावसामुळे पूर्णत: संपले. त्यामुळे आधीच गतवर्षीच्या संकटाने कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत ढकलला गेला आहे. या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या ३ नोव्हेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवशी किमान १00 शेतकरी अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करतील, असा इशारा सुभाष देव्हढे यांनी दिला आहे.