शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
3
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
4
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
5
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
6
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
7
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
8
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
9
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
10
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
11
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
12
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
13
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
14
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
15
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
16
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
17
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
18
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
19
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
20
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा

आईंची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST

नंदकिशाेर नारे वाशिम : गत दाेन वर्षांपासून काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा हळूहळू उघडण्यास सुरुवात ...

नंदकिशाेर नारे

वाशिम : गत दाेन वर्षांपासून काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी मुलाचे भवितव्य पाहता काळजावर दगड ठेवून त्यांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील ८ वी ते १२ वीपर्यंतच्या ग्रामीण भागातील एकूण २७५ शाळा आहेत. यापैकी केवळ ७८ शाळांना सुरुवात झाली आहे. शहरी भाागतील शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येत असून, यालाही ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ ७८ गावांतील शाळांनीच ठराव घेतल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत, तसेच शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमतीसुद्धा आवश्यक असल्याने अद्याप माेठ्या प्रमाणात शाळा सुरू झाल्या नाहीत.

--------------

शाळेतून घरी येताच कपडे बदला; आंघाेळही करा

काेराेनाचा संसर्ग पाहता आई-वडिलांकडून मुलगा शाळेतून आल्याबराेबर कपडे बदलून आंघाेळ घालण्यात येत आहे, तसेच शाळेत पाठविताना काही सूचनांचे पालन करण्यास पालकांकडून सांगण्यात येत आहे. ताेंडाचा मास्क काढू नये, साेबत दिलेल्या सॅनिटायझरने वारंवार हात धुवावा, एकाच ठिकाणी जास्त मुलांच्या मधे राहू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच आपल्या मित्रांनासुद्धा याबाबत सांगावे, अशा सूचना पालकांकडून पाल्यांना देण्यात येत आहेत.

-------------

अ) मास्क काढू नये

ब) वारंवार हात साबणाने धुवावेत किंवा सॅनिटायझर वापरावे

क) साेशल डिस्टन्सिंग पाळावे

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघाेळ करावी

----------

काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे

गत दाेन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन क्लासेस झाले; परंतु शाळेतील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये फरक आहे. मुलांची काळजी आहे, पण त्यांचे भवितव्यही पाहावे लागेल.

-उज्ज्वला दानतकर

पालक, कारखेडा

मुलांचे भवितव्य पाहता मुलांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शिक्षकांसह मुलांनाही काळजी घेण्याबाबत सांगितले आहे. शिक्षकही मुलांवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

-लता गणेश लाेंढे

पालक, काेंडाेली

प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असतेच. भविष्यात त्याने काही तरी करावे यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. याकरिता काेराेना नियम त्याला सांगून खबरदारी घेऊन शाळेत पाठवीत आहाेत.

-अनिता शंबाेले

पालक, काेंडाेली

--------

जिल्ह्यातील एकूण शाळा २७५

सुरू झालेल्या शाळा ७८

अद्याप बंद शाळा १९७