शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आईसह चिमुकली विहिरीत पडली; आई बचावली, चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:57 IST

माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मौजे मारसुळ येथील वैशाली निखिल घुगे वय (२५) हि महिला आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह गावानजीकच्या विहिरीत पडली. यामध्ये माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वैशाली हि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुलगी अणुष्का (वय ४ महिने) हिला सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती पाण्याचे भांडे विहिरीचे काठावर ठेवून अण्षुकाला बाजुला ठेवत असताना वैशालीचा तोल जाऊन ति मुलीसह विहिरीत पडली. पडताक्षणीच मुलगी हातातुन सुटल्याने ति पाण्याच्या तळाशी गेली, परंतु वैशालीला ब-यापैकी पोहणे येत असल्याने तिने पोहुन काठावरील कंगणी पकडून तिचा आधार घेतला, तर मुलगी अणुष्का हि तिच्या डोळ्यादेखत मृत्यूच्या दाढेत खेचल्या गेली. सकाळी गावातील काही महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना वैशाली विहिरीत आढळून आली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशालीला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढले. घटनेची माहिती मालेगाव पोलीसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन चिमुकली अनुष्काचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथे पाठविण्यात आला. वैशाली हिला दुसरी एक पाच वर्षांची मुलगी असल्याचे समजते. चिमुकली अनुष्काच्या दुर्दैवी मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेबाबत ग्रामस्थामध्ये अनेक शंका कुशंका चर्चील्या जात असुन या प्रकरणाचा अधिक तपास मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार उत्तम राठोड शिपाई अमोल पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम