कारंजा/ मंगरुळपीर : वाशिम जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सहानुभूतीची अपेक्षा असताना शासनाच्या विचित्र निकषामुळे निम्म्याहून अधिक आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरत असल्याचे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान दोनशे अठरा शेतकर्यांनी नापिकी, कर्जबाजारी किंवा शेतीसंदर्भातील इतर समस्यांमुळे मृत्यूला कवटाळले. तथापि, त्यापैकी केवळ ६८ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर तब्बल १४३ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, इतर सात आत्महत्या प्रलंबित आहेत किंवा वगळण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान ३१0 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी केवळ ११७ आत्महत्या पात्र ठरल्या, तर तब्बल १८३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, इतर आठपैकी ५ आत्महत्या चौकशीत आणि उर्वरित पाच प्रलंबित किंवा काही कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही गत चार वर्षांंंंतील आकडेवारी अधिक विदारक असून, कारंजा तालुक्यात मागील चार वर्षांंंतील ८६ आत्महत्यांपैकी केवळ ३0 आत्महत्या पात्र, ठरल्या, तर मंगरुळपीर तालुक्यातील ६0 पैकी २९ आत्महत्या पात्र ठरल्या. एकत्रित असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याव्यक्तीसह इतर सदस्य कुटुंबाकडे असलेल्या शेतीत राबराब राबून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, मागील काही वर्षांंंंत नापिकी, अतवृष्टी, गारपीट, पीक चोरी, बँक, कर्ज, सावकारी कर्ज आदी कारणांसहच शेतमालाबाबत शासनाचे धोरण या कारणांमुळे शेतकरी पार खचला आहे. घाम गाळून रुजविलेल्या बियांचे योग्य मोल होत नाही, निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे करावे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत उभा राहत आहे.
शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक!
By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST