शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

जाचक निकषामुळे अपात्रतेचे प्रमाण जास्त; मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील स्थिती.

कारंजा/ मंगरुळपीर : वाशिम जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सहानुभूतीची अपेक्षा असताना शासनाच्या विचित्र निकषामुळे निम्म्याहून अधिक आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरत असल्याचे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान दोनशे अठरा शेतकर्‍यांनी नापिकी, कर्जबाजारी किंवा शेतीसंदर्भातील इतर समस्यांमुळे मृत्यूला कवटाळले. तथापि, त्यापैकी केवळ ६८ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर तब्बल १४३ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, इतर सात आत्महत्या प्रलंबित आहेत किंवा वगळण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान ३१0 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी केवळ ११७ आत्महत्या पात्र ठरल्या, तर तब्बल १८३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, इतर आठपैकी ५ आत्महत्या चौकशीत आणि उर्वरित पाच प्रलंबित किंवा काही कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही गत चार वर्षांंंंतील आकडेवारी अधिक विदारक असून, कारंजा तालुक्यात मागील चार वर्षांंंतील ८६ आत्महत्यांपैकी केवळ ३0 आत्महत्या पात्र, ठरल्या, तर मंगरुळपीर तालुक्यातील ६0 पैकी २९ आत्महत्या पात्र ठरल्या. एकत्रित असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याव्यक्तीसह इतर सदस्य कुटुंबाकडे असलेल्या शेतीत राबराब राबून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, मागील काही वर्षांंंंत नापिकी, अतवृष्टी, गारपीट, पीक चोरी, बँक, कर्ज, सावकारी कर्ज आदी कारणांसहच शेतमालाबाबत शासनाचे धोरण या कारणांमुळे शेतकरी पार खचला आहे. घाम गाळून रुजविलेल्या बियांचे योग्य मोल होत नाही, निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे करावे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत उभा राहत आहे.