शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

जाचक निकषामुळे अपात्रतेचे प्रमाण जास्त; मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील स्थिती.

कारंजा/ मंगरुळपीर : वाशिम जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सहानुभूतीची अपेक्षा असताना शासनाच्या विचित्र निकषामुळे निम्म्याहून अधिक आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरत असल्याचे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान दोनशे अठरा शेतकर्‍यांनी नापिकी, कर्जबाजारी किंवा शेतीसंदर्भातील इतर समस्यांमुळे मृत्यूला कवटाळले. तथापि, त्यापैकी केवळ ६८ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर तब्बल १४३ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, इतर सात आत्महत्या प्रलंबित आहेत किंवा वगळण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान ३१0 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी केवळ ११७ आत्महत्या पात्र ठरल्या, तर तब्बल १८३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, इतर आठपैकी ५ आत्महत्या चौकशीत आणि उर्वरित पाच प्रलंबित किंवा काही कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही गत चार वर्षांंंंतील आकडेवारी अधिक विदारक असून, कारंजा तालुक्यात मागील चार वर्षांंंतील ८६ आत्महत्यांपैकी केवळ ३0 आत्महत्या पात्र, ठरल्या, तर मंगरुळपीर तालुक्यातील ६0 पैकी २९ आत्महत्या पात्र ठरल्या. एकत्रित असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याव्यक्तीसह इतर सदस्य कुटुंबाकडे असलेल्या शेतीत राबराब राबून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, मागील काही वर्षांंंंत नापिकी, अतवृष्टी, गारपीट, पीक चोरी, बँक, कर्ज, सावकारी कर्ज आदी कारणांसहच शेतमालाबाबत शासनाचे धोरण या कारणांमुळे शेतकरी पार खचला आहे. घाम गाळून रुजविलेल्या बियांचे योग्य मोल होत नाही, निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे करावे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत उभा राहत आहे.