शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण निम्म्याहून अधिक!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

जाचक निकषामुळे अपात्रतेचे प्रमाण जास्त; मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील स्थिती.

कारंजा/ मंगरुळपीर : वाशिम जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सहानुभूतीची अपेक्षा असताना शासनाच्या विचित्र निकषामुळे निम्म्याहून अधिक आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरत असल्याचे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान दोनशे अठरा शेतकर्‍यांनी नापिकी, कर्जबाजारी किंवा शेतीसंदर्भातील इतर समस्यांमुळे मृत्यूला कवटाळले. तथापि, त्यापैकी केवळ ६८ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर तब्बल १४३ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, इतर सात आत्महत्या प्रलंबित आहेत किंवा वगळण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यात २00१ ते २0१५ दरम्यान ३१0 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी केवळ ११७ आत्महत्या पात्र ठरल्या, तर तब्बल १८३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, इतर आठपैकी ५ आत्महत्या चौकशीत आणि उर्वरित पाच प्रलंबित किंवा काही कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही गत चार वर्षांंंंतील आकडेवारी अधिक विदारक असून, कारंजा तालुक्यात मागील चार वर्षांंंतील ८६ आत्महत्यांपैकी केवळ ३0 आत्महत्या पात्र, ठरल्या, तर मंगरुळपीर तालुक्यातील ६0 पैकी २९ आत्महत्या पात्र ठरल्या. एकत्रित असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याव्यक्तीसह इतर सदस्य कुटुंबाकडे असलेल्या शेतीत राबराब राबून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, मागील काही वर्षांंंंत नापिकी, अतवृष्टी, गारपीट, पीक चोरी, बँक, कर्ज, सावकारी कर्ज आदी कारणांसहच शेतमालाबाबत शासनाचे धोरण या कारणांमुळे शेतकरी पार खचला आहे. घाम गाळून रुजविलेल्या बियांचे योग्य मोल होत नाही, निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे करावे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत उभा राहत आहे.