शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी भरपावसात शेतकऱ्यांचा भीक मांगो मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

मागील पाच वर्षीपासून सतत शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटे ओढवत आहेत. त्यात शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाकडून कुठला ...

मागील पाच वर्षीपासून सतत शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटे ओढवत आहेत. त्यात शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाकडून कुठला असा दिलासाही देण्याचे ठोस प्रयत्न होत नाहीत. पंतप्रधान पीक विमा योजनाही कुचकामी आहे, मागील वर्षी कापसावर बोंडअळी आली, तर सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचे नुकसान झाले.

पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, पीक विमा योजनेत झालेल्या अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मानोरा पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मनोहर राठोड यांचेसह महंत संजय महाराज, पंजाब चव्हाण, उमेश चव्हाण, शेषराव पवार,विनोद राठोड, बंडू राठोड,राहुल जाधव,विजय चव्हान,प्रेमसिंग जाधव, चेतन चव्हाण, छगन राठोड, प्रवीण राठोड, नितेश राठोड आदि शेतकरी सहभागी झाले होते.

----------------

तालुक्यांत विविध योजनांची मागणी

मानोरा तालुका हा कायमच उपेक्षित असून विकासाने कोसोदूर असलेल्या तालुक्यात शिक्षण, आरोग्य व सिंचनाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष असल्याने डोगराळ व घनदाट जंगलाने व्यापलेल्या या परिसरात वन्य प्राणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतातच आपले बिऱ्हाड घेऊन बस्तान माेडावे लागते. तेव्हा मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा मंजूर करावा, शेतीला तार कुंपणाची योजना मंजूर करावी, कर्ज वसुली थांबवावी, आदि मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.