शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

मोबाईल, टी.व्ही.च्या अतिरेकाने भावी पिढी संकटात -  डॉ. हरीष बाहेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:05 IST

सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते. 

वाशिम: गत काही वर्षांत लहान मुलांमध्ये टी.व्ही. आणि मोबाईलचे आकर्षण वाढत आहे. मूल त्रास देत असल्यास त्याचे मन रमवायला हवे म्हणून पालकच त्यांच्या हातात थेट अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा टी.व्ही.चा रिमोट देऊन मोकळे होतात. यामुळे मात्र मुले गप्प होतात खरी; परंतु पुढे हीच धोकादायक साधने त्यांची आवड किंबहुना सवय बनून भावीपिढीची मन:शांती ढळण्याचे प्रमुख कारण बनण्याचा धोका बळावला आहे. त्यावरील नियंत्रण आणि उपचार, यासंबंधी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते, कुपोषणमुक्ती, माता-बाल आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य कारणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. हरीष बाहेती यांच्याशी साधलेला हा संवाद...

लहान मुलांमध्ये चिडचिडपणा हल्ली वाढतोय, याबाबत काय सांगाल?लहान मुले चिडचिड करतात, जिद्दीपणा करतात; तर त्यास पालकच जबाबदार आहेत. टी.व्ही. आणि अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष पुरवायला पालकांना वेळच मिळेनासा झाला आहे. याशिवाय मुलांचे मन रमविण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. कालांतराने हीच मुले मोबाईल सोडतच नाहीत. सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते. 

आरोग्यासंबंधी आधीची आणि सद्य:स्थिती कशी विषद कराल?साधारणत: दोन पिढ्यांआधी व्यक्ती वयाची नव्वदी सहज पार करायचा. अर्थात त्यांच्या गरजा मर्यादित होत्या. सुटसुटीत दिनक्रम, परिपूर्ण आहार आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणूकीमुळे त्या काळातील माणसांची मने समाधानी असायची. गत काही वर्षांमध्ये मात्र मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्वास्थाकडेही लोकांचे दुर्लक्ष होत आहे. तथापि, पुर्वीच्या काळातील लोकांचे तत्व, जीवनपद्धती आणि संस्कृती अंगीकारण्याची वेळ ओढवल्याच्या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आले आहेत. 

माता-बाल आरोग्यासंबंधी काय सांगाल?सुदृढ आरोग्याचा खरा प्रवास जन्मापूर्वीच सुरू होतो. मातेच्या गर्भात वाढणाºया बाळाला आईच्या रक्तातून पोषक घटक मिळतात. परंतु, अशा पोषक घटकांसोबत काही आजारही संक्रमित होऊ शकतात. असे घडू नये, याकरिता तज्ञांकडून गर्भवतींची नियमित तपासणी होणे आवश्यक ठरते. रुबेला, सिकलसेल अ‍ॅनिमिया असे संक्रमित आजार पुढील पिढीत जडू शकतात. त्यामुळे नियमित तपासणीसह आहाराचे नियोजन गर्भवतींसाठी गरजेचे ठरते, अन्यथा रक्तक्षय, थायरॉईड ग्रंथींशी संबंधित विकार होऊन गर्भाची वाढ व विकासाबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :interviewमुलाखतwashimवाशिमdoctorडॉक्टर