शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल, टी.व्ही.च्या अतिरेकाने भावी पिढी संकटात -  डॉ. हरीष बाहेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:05 IST

सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते. 

वाशिम: गत काही वर्षांत लहान मुलांमध्ये टी.व्ही. आणि मोबाईलचे आकर्षण वाढत आहे. मूल त्रास देत असल्यास त्याचे मन रमवायला हवे म्हणून पालकच त्यांच्या हातात थेट अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा टी.व्ही.चा रिमोट देऊन मोकळे होतात. यामुळे मात्र मुले गप्प होतात खरी; परंतु पुढे हीच धोकादायक साधने त्यांची आवड किंबहुना सवय बनून भावीपिढीची मन:शांती ढळण्याचे प्रमुख कारण बनण्याचा धोका बळावला आहे. त्यावरील नियंत्रण आणि उपचार, यासंबंधी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते, कुपोषणमुक्ती, माता-बाल आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य कारणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. हरीष बाहेती यांच्याशी साधलेला हा संवाद...

लहान मुलांमध्ये चिडचिडपणा हल्ली वाढतोय, याबाबत काय सांगाल?लहान मुले चिडचिड करतात, जिद्दीपणा करतात; तर त्यास पालकच जबाबदार आहेत. टी.व्ही. आणि अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष पुरवायला पालकांना वेळच मिळेनासा झाला आहे. याशिवाय मुलांचे मन रमविण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. कालांतराने हीच मुले मोबाईल सोडतच नाहीत. सातत्याने टी.व्ही.समोरच लागून असतात, त्यांना वेळकाळच काय; पण भुकेचेही भान राहत नाही, अशी पालकांचीच तक्रार राहते. 

आरोग्यासंबंधी आधीची आणि सद्य:स्थिती कशी विषद कराल?साधारणत: दोन पिढ्यांआधी व्यक्ती वयाची नव्वदी सहज पार करायचा. अर्थात त्यांच्या गरजा मर्यादित होत्या. सुटसुटीत दिनक्रम, परिपूर्ण आहार आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणूकीमुळे त्या काळातील माणसांची मने समाधानी असायची. गत काही वर्षांमध्ये मात्र मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्वास्थाकडेही लोकांचे दुर्लक्ष होत आहे. तथापि, पुर्वीच्या काळातील लोकांचे तत्व, जीवनपद्धती आणि संस्कृती अंगीकारण्याची वेळ ओढवल्याच्या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आले आहेत. 

माता-बाल आरोग्यासंबंधी काय सांगाल?सुदृढ आरोग्याचा खरा प्रवास जन्मापूर्वीच सुरू होतो. मातेच्या गर्भात वाढणाºया बाळाला आईच्या रक्तातून पोषक घटक मिळतात. परंतु, अशा पोषक घटकांसोबत काही आजारही संक्रमित होऊ शकतात. असे घडू नये, याकरिता तज्ञांकडून गर्भवतींची नियमित तपासणी होणे आवश्यक ठरते. रुबेला, सिकलसेल अ‍ॅनिमिया असे संक्रमित आजार पुढील पिढीत जडू शकतात. त्यामुळे नियमित तपासणीसह आहाराचे नियोजन गर्भवतींसाठी गरजेचे ठरते, अन्यथा रक्तक्षय, थायरॉईड ग्रंथींशी संबंधित विकार होऊन गर्भाची वाढ व विकासाबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :interviewमुलाखतwashimवाशिमdoctorडॉक्टर