शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्ता ठरतोय ‘मृगजळ’!

By admin | Updated: October 24, 2016 02:35 IST

सत्र २0११-१२ पासून ‘छदाम’ही मिळाला नाही; अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात आर्थिक अडथळा.

सुनील काकडे वाशिम, दि. २३- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना इयत्ता ९ वी ते १२ वी यादरम्यान शिक्षणाकरिता देय असलेला प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता बाळगली जात आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्हय़ात २0११-१२ पासून एकाही विद्यार्थिनीला प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही.समाजातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा, या उद्देशाने शासनस्तरावरून विविध महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आल्या; मात्र संबंधित योजनांची प्रशासकीय यंत्रणेकडून प्रभाविरीत्या अंमलबजावणी होत नाही. तसेच शासनस्तरावरून वेळेवर निधीच मिळत नसल्याने बहुतांश योजना अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. इयत्ता नववी उत्तीर्ण झाल्यानंतर दहावीत प्रवेश मिळताच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनीस इयत्ता बारावीपर्यंंंत प्रतीवर्ष ३ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविली जाते. यासाठी शाळेत शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मुलींची संख्या, कौटुंबिक मिळकत, यासह इतर आवश्यक माहिती सादर करणे शाळांच्या मुख्याध्यापकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्वच शाळांनी गेल्या ५ वर्षांंंपासून दरवर्षी न चुकता ही माहिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर केली. प्रोत्साहन भत्त्याची देय असलेली र क्कम थेट विद्यार्थिनींच्या खात्यात जमा करण्याची तरतूद असल्याने खाते क्रमांक चुकीचा कळविणे, ह्यआयएफसी कोडह्ण व्यवस्थित न कळविणे, यासह यासंदर्भातील अर्जामध्ये विविध प्रकारच्या त्रुटी निर्माण झाल्याने २0११-१२ पासून जिल्हय़ातील एकाही विद्यार्थिनीस प्रोत्साहन भत्ताच मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. यामुळे मात्र अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील तथा गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षण घेताना आर्थिक चणचण भासत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाने प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात उद्भवलेल्या समस्या तत्काळ निकाली काढून विद्यार्थिनींना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरत आहे. प्रलंबित रक्कम पोहचली ६५ लाखांच्या घरात!शैक्षणिक सत्र २0११-१२ पासून जिल्हय़ातील एकाही शाळेतील विद्यार्थिनीच्या बँक खात्यामध्ये देय असलेली प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जमा झालेली नाही. शासनाकडे प्रलंबित असलेला प्रोत्साहन भत्त्याचा हा आकडा सुमारे ६५ लाख रुपयांच्या घरात पोहचला आहे. गेल्या पाच वर्षांंंत पात्र असलेल्या अनेक विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्याचा विसरही पडला असेल, अशी एकंदरीत स्थिती आहे.'एनएमएमएस' शिष्यवृत्तीचाही झाला 'लोचा'!सन २0१0 आणि २0११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या 'एनएमएमएस' या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्यामुळे जिल्हय़ातील पात्र २६८ विद्यार्थ्यांंंना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ६ वर्षांंंपासून थकीत आहे. याकामी ह्यबेपर्वाईह्ण करणारे तत्कालीन शिक्षणाधिकारी विश्‍वास लबडे यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी, अशी शिक्षण संचालकांची सूचना असताना हा प्रश्न अद्या पही सुटलेला नाही. यासह अल्पसंख्याक प्रवर्गातील जिल्हय़ातील हजारो विद्यार्थ्यांंंनाही सन २0१२ पासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्याही शिक्षणात मोठा अड थळा निर्माण झाला आहे. एकूणच शासनस्तरावरून विद्यार्थ्यांंंंसाठी अमलात आलेल्या सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे शासनाने या योजनांचा पोकळ आव आणण्यापेक्षा संबंधित योजनाच बंद करून टाकाव्यात, असा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे. जिल्हय़ातील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी दरवर्षी त्यांच्या शाळांमधील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींची माहिती शासनाला कळविलेली आहे; मात्र शासनाकडून २0११-१२ पासून आजतागायत विद्यार्थिनींना देय असलेला प्रोत्साहन भत्ता प्रलंबित आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघटनेने पूर्वीपासून लढा उभारला असून तो अधिक तीव्र करून विद्यार्थिनींचे हित जोपासण्याचे प्रयत्न केले जातील.- अशोक ठाकरेजिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ