शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

काेराेना काळातही अल्पवयीन मुली ‘अनलॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता ...

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता यामध्ये वाढ असल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण जास्त झाल्याचे पाेलीस दप्तरी असलेल्या नाेंदीवरून दिसून येते.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधासह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊन काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काेराेना काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये एकूण ४३ मुलींची नाेंद करण्यात आली आहे. २०१९ मध्ये ५९, २०२० मध्ये ७० तर मे २०२१ पर्यंत २२ मुलींचा समावेश आहे. २०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता दरवर्षी यामध्ये वाढच झाल्याचे दिसून येत आहे. यामधील अनेक प्रेमप्रकरणाचाच समावेश असल्याचे तपास कार्यातून दिसून येते.

...............

८० टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण १९४ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ८० टक्केच्या जवळपास आहे. केवळ २० टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही. २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या १९४ मुलीपैकी १७१ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये ४१, २०१९ मध्ये ५२, २०२० मध्ये ६२ तर २०२१ मध्ये १६ मुलींचा समावेश आहे. २०१८ मधील ४३ पैकी केवळ २ मुलींचा शाेध लागला नसून चालू वर्षातील ६ मुलींचा शाेध पाेलीस विभागाकडून घेतल्या जात आहे.

..........

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते. परंतु ज्यांना सांगून जातात ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपास कार्यात अडचणी येतात. परंतु पाेलीस खाक्या दाखविल्याबराेबर अनेकजण पटकन सांगण्यास सुरुवात करतात.

........

काेराेना काळात काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता पाेलीस विभाग व्यस्त हाेता. पाेलिसांनी काेराेना काळात चांगले कार्य केले आहेत. दरम्यान अल्पवयीन मुलींचे अपहरण, बेपत्ता हाेण्याचे प्रमाण कमीच आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्यात यात बहुतांशी प्रेम प्रकरण असे प्रकारच जास्त असतात.परंतु सर्वाचे शाेध लागलेत.

- शिवा ठाकरे,

पाेलीस निरीक्षक, वाशिम