शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

काेराेना काळातही अल्पवयीन मुली ‘अनलॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता ...

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता यामध्ये वाढ असल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण जास्त झाल्याचे पाेलीस दप्तरी असलेल्या नाेंदीवरून दिसून येते.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधासह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊन काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काेराेना काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये एकूण ४३ मुलींची नाेंद करण्यात आली आहे. २०१९ मध्ये ५९, २०२० मध्ये ७० तर मे २०२१ पर्यंत २२ मुलींचा समावेश आहे. २०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता दरवर्षी यामध्ये वाढच झाल्याचे दिसून येत आहे. यामधील अनेक प्रेमप्रकरणाचाच समावेश असल्याचे तपास कार्यातून दिसून येते.

...............

८० टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण १९४ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ८० टक्केच्या जवळपास आहे. केवळ २० टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही. २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या १९४ मुलीपैकी १७१ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये ४१, २०१९ मध्ये ५२, २०२० मध्ये ६२ तर २०२१ मध्ये १६ मुलींचा समावेश आहे. २०१८ मधील ४३ पैकी केवळ २ मुलींचा शाेध लागला नसून चालू वर्षातील ६ मुलींचा शाेध पाेलीस विभागाकडून घेतल्या जात आहे.

..........

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते. परंतु ज्यांना सांगून जातात ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपास कार्यात अडचणी येतात. परंतु पाेलीस खाक्या दाखविल्याबराेबर अनेकजण पटकन सांगण्यास सुरुवात करतात.

........

काेराेना काळात काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता पाेलीस विभाग व्यस्त हाेता. पाेलिसांनी काेराेना काळात चांगले कार्य केले आहेत. दरम्यान अल्पवयीन मुलींचे अपहरण, बेपत्ता हाेण्याचे प्रमाण कमीच आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्यात यात बहुतांशी प्रेम प्रकरण असे प्रकारच जास्त असतात.परंतु सर्वाचे शाेध लागलेत.

- शिवा ठाकरे,

पाेलीस निरीक्षक, वाशिम