शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जलसंपदा मंत्र्यांकडून व्यासपीठावरच नळयोजनेसाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST

मालेगाव तालुक्यातील पुनर्वसित पांगरखेडा व घाटा या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. ही समस्या निवारणासाठी नळयोजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे; ...

मालेगाव तालुक्यातील पुनर्वसित पांगरखेडा व घाटा या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. ही समस्या निवारणासाठी नळयोजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे; परंतु ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुनर्वसित पांगरखेडा व घाटा गट ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची समस्या दूर करणे मोठ्या निधीशिवाय शक्य नव्हते. अशातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त रिसोड तालुक्यात आले होते. तेथे त्यांना पांगरखेडा, घाटा, गट ग्रामपंचायतीच्या सरपंच फलंगा रमेश चव्हाण यांनी निवेदन देऊन पाणीपुरवठा नळयोजनेसाठी निधीची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी पांगरखेडा घाटा नळयोजनेसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे सरपंच फलंगाबाई चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

-----------

मार्च महिन्यांत होणार काम सुरू

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी रिसोड तालुक्यातील भेटीदरम्यान विविध गावांतील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पांगरखेडा, घाटा ग्रामपंचायत सरपंच फलंगा चव्हाण यांच्या मागणीनुसार नळयोजनेसाठी केवळ ५० लाखांचा निधीच मंजूर केला नाही, तर समस्या लवकर निकाली लागावी म्हणून मार्च महिन्यापासूनच काम सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासनही दिले.