शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

जलसंपदा मंत्र्यांकडून व्यासपीठावरच नळयोजनेसाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST

मालेगाव तालुक्यातील पुनर्वसित पांगरखेडा व घाटा या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. ही समस्या निवारणासाठी नळयोजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे; ...

मालेगाव तालुक्यातील पुनर्वसित पांगरखेडा व घाटा या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. ही समस्या निवारणासाठी नळयोजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे; परंतु ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुनर्वसित पांगरखेडा व घाटा गट ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची समस्या दूर करणे मोठ्या निधीशिवाय शक्य नव्हते. अशातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त रिसोड तालुक्यात आले होते. तेथे त्यांना पांगरखेडा, घाटा, गट ग्रामपंचायतीच्या सरपंच फलंगा रमेश चव्हाण यांनी निवेदन देऊन पाणीपुरवठा नळयोजनेसाठी निधीची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी पांगरखेडा घाटा नळयोजनेसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे सरपंच फलंगाबाई चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

-----------

मार्च महिन्यांत होणार काम सुरू

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी रिसोड तालुक्यातील भेटीदरम्यान विविध गावांतील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पांगरखेडा, घाटा ग्रामपंचायत सरपंच फलंगा चव्हाण यांच्या मागणीनुसार नळयोजनेसाठी केवळ ५० लाखांचा निधीच मंजूर केला नाही, तर समस्या लवकर निकाली लागावी म्हणून मार्च महिन्यापासूनच काम सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासनही दिले.